घरकर्नाटक विधानसभा निवडणूक २०२३कर्नाटकात बजरंग दलवर बंदी? कॉंग्रेसने जाहिरनाम्यात दिले आहे आश्वासन

कर्नाटकात बजरंग दलवर बंदी? कॉंग्रेसने जाहिरनाम्यात दिले आहे आश्वासन

Subscribe

 

नवी दिल्लीः कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात कॉंग्रेसने बजरंग दलवर बंदी आणण्याचे आश्वासन दिले आहे. निवडणुकीचे आतापर्यंत जे निकाल आले आहेत, त्यात कॉंग्रेसला स्पष्ट बहुमत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे कॉंग्रेसने जाहिरनाम्यात दिलेल्या आश्वासनानुसार आता कर्नाटकात बजरंग दलवर बंदी आणली जाईल का हे बघावे लागेल.

- Advertisement -

कॉंग्रेसच्या या आश्वासनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीका केली होती. कॉंग्रेस भाजप द्वेषी आहे. प्रभू रामानंतर आता कॉंग्रेस बजरंग बलीच्या मागे लागले आहे, आरोप पंतप्रधान मोदी यांनी केला होता. मात्र कर्नाटक निवडणुकीच्या निकालात जनतेने कॉंग्रेसला कौल दिला आहे. परिणामी एक हाती सत्तेकडे वाटचाल सुरु असलेली कॉंग्रेस बजरंग दलवर कधी बंदी आणणार हे बघावे लागेल.

मात्र कॉंग्रेसने ३१ वर्षांपूर्वीच बजरंग दलवर बंदी आणली होती. राष्ट्रीय स्वंयसेवक संघ (आरएसएस), विश्व हिंदू परिषद(व्हीएचपी), बजरगंर दल, इस्लामिक सेवक संघ आणि जमात-ए-इस्लामी हिंद या पाच संघटनांवर कॉंग्रेसने बंदी आणली होती. तत्कालीन पंतप्रधान नरसिम्हा राव यांनी ९ डिसेंबर १९९२ रोजी राजपत्र जारी करुन या संघटनांवर अवैध कृत्य प्रतिबंधक कायद्यातंर्गत बंदी आणली होती. त्यावेळी कोणाला अटक करण्यात आली नाही.

- Advertisement -

आरएसएस, व्हीएचपी आणि बजरंग दल या संघटनांनी बाबरी विध्वंसात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या संघटना देशात धार्मिक तेढ निर्माण करत आहेत. या संघटनांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे, असे नरसिम्हा राव सरकारने स्पष्ट केले होते.

राम मंदिरचे आंदोलन १९८४ साली बजरंग दलने सुरु केले. बजरंग दलचे प्रमुख विनय कटियार यांनी या आंदोलनासाठी कारसेवकांना एकत्र केले. आंदोलनाची तयारी केली. बजरंग दलनेच हे आंदोलन आक्रमक केले. राम मंदिर हा सांस्कृतिक मुद्दा बनवून बजरंग दलने हे आंदोलन केले होते.

केंद्र सरकारने बजरंग दलवर बंदी आणली पण त्याची अंमलबजावणी झाली नाही. केंद्र सरकारने बजरंग दलबाबत मवाळ भूमिका घेतली. बंदी नंतरही बजरंग दल सक्रिय होती. देशातील विविध भागात बजरंग दल वेगळ्या नावाने कार्यरत आहे. बजरंग दलच्या नेत्यांना अजूनही अटक झालेली नाही.

केंद्र सरकारने बंदी आणल्यानंतर न्यायालय किंवा प्राधिकरण संबंधित संघटनेला नोटीस जारी करते. तुमच्या संघटनेवर बंदी का आणू नये याचे उत्तर सादर करण्यास संघटनेला सांगितले जाते. ३० दिवसांत उत्तर सादर झाल्यानंतर त्यावर निर्णय होतो. अशाच प्रकारे ६ महिन्यातच बजरंग दल व आरएसएसवरील बंदीवर निर्णय झाला. या दोन्ही संघटनांवरील बंदी उठवण्यात आली. मात्र व्हीएचपीवर बंदी कायम ठेवण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -