घरदेश-विदेशएनडीएत नेतृत्व बदलाचा प्रश्नच येत नाही - अमित शाह

एनडीएत नेतृत्व बदलाचा प्रश्नच येत नाही – अमित शाह

Subscribe

एनडीए सरकारच्या बदलाविषीयी बोलताना शाह म्हणाले की, नेतृत्व बदलाचा काही प्रश्नच येत नाही. एनडीए २०१९ची निवडणूक मोदींच्या नेतृत्वाखालीच लढवेल.

‘सत्तारुढ एनडीए सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालीच २०१९ची निवडणूक लढवणार असून, निवडणुंकासाठी एनडीएच्या नेतृत्वात कुठलाही बदल होणार नाही, असं स्पष्टीकरण भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी बुधवारी दिलं. ते एका वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी एनडीएच्या नेतृत्व बदलाची गोष्ट साफ नाकारली. यावेळी एनडीए सरकारच्या बदलाविषीयी बोलताना शाह म्हणाले की, नेतृत्व बदलाचा काही प्रश्नच येत नाही. एनडीए २०१९ची निवडणूक मोदींच्या नेतृत्वाखालीच लढवेल. यासंबंधी वाहिनीच्या संपादकांनी विचारलेल्या प्रश्नावर शाह म्हणाले की, २०१४ मध्ये केवळ ६ राज्यांमध्ये भाजपाची सत्ता होती. जी आता १६ राज्यांमध्ये आहे. त्यामुळे आपणच सांगा की नक्की कोण जिंकेल? असा उपप्रश्नही त्यांनी केला.


वाचा : मोदींवर टीका करणाऱ्या पत्रकाराला पोलीस कोठडी

कार्यक्रमात अमित शाह पुढे शाह म्हणाले की, विविध मुद्द्यांवर राज्य आणि केंद्रामध्ये निवडणुका लढवल्या जातात. त्यानुसार २०१९ ची सार्वत्रिक निवडणूक देश पातळीवरील मुद्द्यांवर लढवली जाईल. दरम्यान, वसंतराव नाईक स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी आणि महाराष्ट्रातील प्रमुख शेतकरी नेते यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत आणि महासचिव भैयाजी जोशी यांना पत्र लिहिले होते. त्यामुळे आता अमित शाह यांचे हे विधान महत्वपूर्ण मानले जात आहे. ‘भाजपाला जर २०१९ ची निवडणूक जिंकावी असं वाटत असेल तर त्यांनी अहंकारी मोदींना हटवावे
आणि विनम्र नितीन गडकरी यांना त्यांच्या जागी बसवावे,’ असं निवेदन किशोर तिवारी यांनी मोहन भागवत यांना लिहिलेल्या पत्रात केले होते.


वाचा: …आणि कुत्र्याला मिळाला ‘डिप्लोमा’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -