स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशाला उद्देशून भाषण केले. यावेळी अलिकडच्या काळात जगाने एक नवीन भारत पाहिला आहे. आधुनिक भारताच्या निर्मात्यांनी प्रत्येक प्रौढ नागरिकाला राष्ट्रनिर्मितीच्या सामूहिक प्रक्रियेत सहभागी होण्यास सक्षम केले असून भारतामुळेच जगाला लोकशाहीची खरी क्षमता कळली असल्याचे म्हटले.
…त्यामुळे आपण आपल्या देशाचे रक्षण केले पाहिजे –
सर्व स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन करत त्यांनी भाषणाला सुरूवात केली. आपण स्वतंत्र भारतात श्वास घेण्यासाठी सर्वस्वाचा त्याग केला आहे. अनेक देशांमध्ये महिलांना मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला. मात्र, भारताने स्वातंत्र्यापासूनच सार्वत्रिक प्रौढ मताधिकार स्वीकारला. त्यामुळे आपण आपल्या देशाचे रक्षण केले पाहिजे. असे त्या म्हणाल्या.
हमारे पास जो कुछ भी है वह हमारी मातृभूमि का दिया हुआ है। इसलिए हमें अपने देश की सुरक्षा, प्रगति और समृद्धि के लिए अपना सब कुछ अर्पण कर देने का संकल्प लेना चाहिए। pic.twitter.com/Uib2axfaDz
— President of India (@rashtrapatibhvn) August 14, 2022
भारत पुन्हा वेगाने वाटचाल करतोय –
भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा जगातील अनेकांना भारतात लोकशाही यशस्वी होईल की नाही, याबाबत साशंकता होती. मात्र, आज भारतामुळेच जगाला लोकशाहीची क्षमता समजली. दोन ते तीन वर्षात जगात कोरोना महामारीने थैमान घातले होते. यावेळी जगातली सर्वात मोठी लसीकरण मोहीम भारताने राबवली. गेल्या महिन्यात भारताने २०० कोटींच्या लसीकरणाचा टप्पा ओलांडला असून कोरोनाच्या सामना करताना भारताने जगातील अनेक विकसीत देशांपेक्षा चांगली परिस्थिती हाताळली आणि आज भारत पुन्हा वेगाने वाटचाल करत आहे, असे त्या म्हणाल्या.