गेल्या दोन महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे भारतीय रेल्वेने प्रवासी वाहतूक बंद ठेवली आहे. रेल्वे सुरू झाल्यापासूनच्या इतिहासात पहिल्यांदाच रेल्वेने प्रवासी वाहतूक इतक्या मोठ्या काळासाठी बंद ठेवली आहे. मात्र, आता अखेर ती प्रवासी वाहतूक पुन्हा सुरू होणार असून रेल्वेमंत्र्यांनीच ट्वीटवरून ही घोषणा केली आहे. येत्या १ जूनपासून देशात नॉन एसी रेल्वे सुरू होणार असून त्याची ऑनलाईन बुकिंग लवकरच सुरू होणार असल्याचं त्यांनी या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. देशभरात रोज २०० रेल्वे धावणार आहेत. मात्र, त्याचे बुकिंग नेमके कधीपासून सुरू होणार, याविषयी मात्र रेल्वेमंत्र्यांनी माहिती दिलीली नाही.
इसके अतिरिक्त भारतीय रेल 1 जून से टाइम टेबल के अनुसार प्रतिदिन 200 नॉन एसी ट्रेन चलायेगा जिसकी ऑनलाइन बुकिंग शीघ्र ही शुरु होगी।
— Piyush Goyal (@PiyushGoyal) May 19, 2020
दरम्यान, देशभरात विविध ठिकाणी अडकलेल्या मजुरांना नेणाऱ्या श्रमिक ट्रेन सध्या दिवसाला २०० धावत आहेत. लवकरच त्यामध्ये वाढ करण्यात येणार असल्याचं देखील रेल्वेमंत्र्यांनी जाहीर केलं आहे.
श्रमिकों के लिये बड़ी राहत, आज के दिन लगभग 200 श्रमिक स्पेशल ट्रेन चल सकेंगी, और आगे चलकर ये संख्या बड़े पैमाने पर बढ़ पायेगी।
— Piyush Goyal (@PiyushGoyal) May 19, 2020