घरताज्या घडामोडीTata sons win air india bid : एअर इंडियासाठीची बोली टाटा सन्सने...

Tata sons win air india bid : एअर इंडियासाठीची बोली टाटा सन्सने जिंकली

Subscribe

टाटा सन्सने एअर इंडिया टेकओव्हर करण्यासाठीच्या निविदा प्रक्रियेत मोठे यश मिळवले आहे. मंत्र्यांच्या पॅनेलने टाटा सन्सच्या बोली प्रक्रियेवर शिक्कामोर्तब करत हा प्रस्ताव मान्य केल्याचे वृत्त ब्लूमबर्ग या इंग्रजी संकेतस्थळाने प्रसिद्ध केले आहे. एका अहवालाच्या आधारे या संकेतस्थळाने ही माहिती दिली आहे. पण याबाबतची अधिकृत घोषणा मात्र काही दिवसांनी होणार असल्याचे कळते. तसेच मनीकंट्रोल या संकेतस्थळानेही याबाबतचे वृत्त दिले आहे. टाटा सन्स तसेच नागरी उड्डाण मंत्रालयाच्या सूत्रांच्या आधारे ही माहिती समोर आली आहे. टाटा सन्सने दाखल केलेली निविदा हा सरकारने निश्चित केलेल्या आरक्षित रकमेपेक्षा ३ हजार कोटींनी जास्त होती असते कळते.

टाटा सन्सकडून या वृत्ताबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. तसेच प्रसारमाध्यमांच्या प्रश्नाला उत्तर देणेही टाटा सन्सने टाळले आहे. नागरी उड्डाण मंत्रालयाकडूनही याबाबतची कोणतीही माहिती देण्यात आली नाही. तसेच एअर इंडियानेही यावर प्रतिक्रिया देण्यासाठी नकार दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सध्याच्या सरकारने तोट्यातील एअर इंडिया कंपनीला बेलआऊट पॅकेज देण्यासाठी सत्तेत आल्यापासून प्रयत्नशील आहे.

- Advertisement -

सरकारचा दररोज २० कोटी रूपये इतका तोटा एअऱ इंडिया सुरू ठेवण्यासाठी होत आहे. एअर इंडियाला आतापर्यंत ७० हजार कोटींचा तोटा झाला आहे. एअर इंडियाची मालकी हस्तांतरीत करण्यासाठीची निविदा प्रक्रिया ही गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे. पण या निविदा प्रक्रियेला कोणताही प्रतिसाद सुरूवातीच्या टप्प्यात आला नव्हता. कोरोना काळातही या निविदा प्रक्रियेचा कालावधी सातत्याने वाढवण्यात आला.

सूत्रांच्या माहितीनुसार एअऱ इंडियाने आरक्षित ठेवलेली बोली प्रक्रियेतील किंमत ही १५ हजार ते २० हजार कोटीच्या घरात होती. १९३२ साली स्थापन झालेल्या एअऱ इंडियाचे आधीचे नाव हे टाटा एअरलाईन्स होते. भारतातील पहिले परवानाधारक पायलट असलेले जेआरडी टाटा यांनी या कंपनीची स्थापना केली होती. त्यानंतर १९४७ साली या कंपनीचे राष्ट्रीयीकरण झाले. एअर इंडिया टेकओव्हर करण्यासाठी टाटा सन्सने खूपच उत्सुकता दाखवली असल्याची माहिती आहे. टाटाने आतापर्यंत प्रिमिअर अशी विस्तराची सेवा सिंगापूर एअरलाईन्ससोबत संयुक्तिकपणे दिलेली आहे.

- Advertisement -

जानेवारी २०२० मध्येच या कंपनीच्या हिश्शेदारीच्या विक्री प्रक्रियेला सुरूवात झाली होती. पण कोरोनाच्या संकटामुळे या संपुर्ण प्रक्रियेत दिरंगाई झाली. एप्रिल २०२१ मध्ये सरकारने वित्तीय निविदा प्रक्रियेचा टप्पा सुरू केला. टाटा ग्रुपने डिसेंबर २०२० मध्येही महाराजा ग्रुप टेकओव्हर करण्याच्या प्रयत्नात होती.

एअऱ इंडिया सातत्याने म्हणजे २००७ पासून तोट्यात आहे. या निविदा प्रक्रियेत टाटा विजयी ठरल्याने आता टाटाकजे ४४०० डोमेस्टिक आणि १८०० इंटरनॅशनल लॅंडिंग तसेच पार्किंट स्लॉट्सचा ताबा येणार आहे. त्यामध्ये डोमेस्टिक तसेच ९०० परदेशी स्लॉट्सचाही ताबा असेल.


Air India खरेदी करण्यासाठी Tata Sonsने लावली बोली; शेवटच्या टप्प्यात पोहोचली गुंतवणुकीची प्रक्रिया

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -