सर्वांना वाटते की आपले वैवाहिक जीवन सुखी असावे. नवरा बायकोमध्ये कधीही भांडण होऊ नये, नवऱ्याने कामात मदत करावी, जगात कोणी कोणावर प्रेम केलं नसेल इतक प्रेम नवऱ्याने पत्नीवर करावे. याच गोष्टी जर घटस्फोटासाठी कारणीभूत ठरल्या तर. ऐकून नवल वाटले ना. पण हे खरं आहे. उत्तर प्रदेशातील संबल जिल्ह्यात अशी एक अनोखी घटना घडली आहे. पत्नीने नवरा अति प्रेम करतो, कधीही भांडत नाही म्हणून घटस्फोटासाठी थेट कोर्टात अर्ज केला आहे. या महिलेने घटस्फोटासाठी कोणतेही अत्याचार, अवैध मागणीचे कारण न देता खरेखुर नवऱ्याच्या अति प्रेमाचेच कारण दिले आहे. संबल जिल्ह्यातील शरिया कोर्टात हा घटस्फोटाचा अर्ज दाखल केला असून कोर्टाने मात्र हा अर्ज नामंजूर केला आहे.
या महिलेच्या म्हणण्यानुसार, तिचा नवरा खुपच प्रेमळ आहे, कधीही तिच्याशी भांडत नाही, तिला घरातील सर्व कामांमध्ये मदत करतो, तिच्याकडून काही चूक झाल्यास तिला रागवत नाही, तर माफ करतो. परंतू तिला असा नवरा नको होता. त्या महिलेला भांडणारा नवरा हवा होता. असा अर्ज कोर्टात दाखल केल्यानंतर कोर्टानेही घटस्फोटासाठी कोणते ठोस कारण नसल्याचे सांगत हा अर्ज फेटाळला आहे. तसेच पती – पत्नीने सामंजस्याने हा प्रश्न सोडवावा, असा सल्लाही त्यांनी तिला आहे.
हेही वाचा –
शिवसेनेकडूनच आदित्य ठाकरेंची कोंडी? नितेश राणेंनी शेअर केले अनिल परब यांचे ‘ते’ ट्विट