दिग्दर्शक राम गोपाल वर्मा सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. चित्रपटाव्यतिरिक्त अनेक सामाजिक, राजकारणातील मुद्यांवर सडेतोडपणे टीका करतात तसेच आपले मत मांडतात. नुकतच राम गोपाल यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंट वर ट्विट केल आहे त्याची जोरदार चर्चा होताना दिसतेय. सध्या हरिद्वार मध्ये कुंभमेळा सुरू झाला आहे. अनेक लोक शाही स्नान करण्यासाठी कुंभमेळ्यात दाखल झाले आहेत. या कारणांवरून दिग्दर्शक राम गोपाल वर्मा चांगलेच भडकले आहेत. त्यांनी ट्वीटर वरुण कुंभमेळ्यात दाखल झालेल्या लोकांचा चांगलाच पाहुणचार केला आहे.
राम गोपाल वर्मा यांनी ट्विट केले आहे की ”लाखो लोक कुंभमेळ्यात आपले कर्म स्वच्छ करण्यासठी डुबकी मारत आहेत, आणि त्यांना आशीर्वादाच्या रूपात कोविड मिळत आहे. आणि हेच लोक पुढे जाऊन अनेक लोकांमधे कोविडचा संसर्ग पसरवणार आहेत. जेव्हा हे लोक मरण पावतिल तेव्हा त्यांना दुप्पट कर्म भोगावे लागतील.”
Lakhs are dipping in kumbh mela to wash off their karma and as a blessing are getting the covid and then they are further gifting it to many more and when they die all will get double karma.😍😍😍😍
— Ram Gopal Varma (@RGVzoomin) April 14, 2021
तसेच आणखीन एक ट्विट करत राम गोपाल वर्मा पुढे लिहतात की ”१७ लाख मुंबईकरांना कोरोना लसीकरणसाठी ६ आठवड्यांचा कालावधी लागला होता. आणि ३५ लाख लोकांना महाकुंभात डुबकी मारण्यासाठी फक्त १ दिवस लागला आहे . याने सिद्ध होत आहे की लोकांना पुढील जन्माची या जन्मा पेक्षा जास्त चिंता आहे. ”
It took 6 weeks for 17 Lakh Mumbaikars to take Covid Vaccine
It took 1 day for 35 Lakh people to take a dip at Maha Kumbh
So it is proved people are interested in next life than this life 😎😎😎
— Ram Gopal Varma (@RGVzoomin) April 14, 2021
देशामध्ये कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता राम गोपाल वर्मा यांनी कुंभमेळ्या मधील लोकांच्या वाढती गर्दी पाहता यावर निंदा व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी कुंभमेळ्याचे अनेक फोटो शेअर करून हा लोकांचा मूर्खपणा आहे असे देखील म्हंटले होते.
हे हि वाचा – अमिताभ बच्चन रमले सुपरहिट चित्रपटांच्या आठवणीत, म्हणाले… आता OTT प्लॅटफॉर्मकडून लाखो यशाचे आलेख निर्मिती