बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत नेहमीच तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. सध्या तिचा नवा रिएलिटी शो लॉकअप अनेकांसाठी आकर्षणाचा विषय बनलेला आहे. हा शो आता आपले नवनवे रंग दाखवत आहे. सहभागी झालेल्या कैद्यांनी(स्पर्धकांनी) आपल्या वेगवेगळ्या अंदाजाने या रिएलिटी शोला चारचाँद लावलेले आहेत. या शोला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या आठवड्यात या शोमधून एका कैद्याची (स्पर्धकाची) सुटका झाली. शोच्या पहिल्याच आठड्यात स्वामी चक्रपाणी महाराज बाद झाले आहेत.
View this post on Instagram
डेंजर झोनमध्ये होते हे ३ स्पर्धक
कंगनाच्या जेलमधून बाहेर जाण्यासाठी 5 स्पर्धक एलिमिनेशमनमध्ये होते, मुनव्वर फारुकी या स्पर्धकाला प्रेक्षकांनी मत देऊन वाचवलं होतं, शिवम शर्माला घरातील इतर सदस्यांनी त्यांची मतं देऊन वाचवलं होतं. मुनव्वर आणि शिवमनंतर बॉटम 3 मध्ये सिद्धार्थ शर्मा, अंजली अरोरा आणि स्वामी चक्रपाणी हे तिघे होते. दरम्यान, या तिघांमधून स्वामी चक्रपाणी महाराज बाद झाले. खरं तर स्वामी चक्रपाणी महाराज यांनी स्वतः इथून जाण्याची इच्छा व्यक्त केली, त्यामुळे त्यांच्यासोबत बॉटम 2 मध्ये असणाऱ्या सिद्धार्थ शर्माला वाचवण्यात आलं.
जेलमध्ये राहण्यासाठी अंजलीने सांगितलं तिचं गुपित
कंगना रनौतच्या जेलमध्ये राहणं इतकं सोपं नाही, बॉटम 3 मधील स्पर्धकांना सुरक्षित होण्यासाठी कंगनाने त्यांना त्यांचे सीक्रेट सांगण्याची सूचना दिली. तेव्हा अंजली अरोराने सगळ्यात आधी बजर दाबला आणि तिचं सीक्रेट सांगून सुरक्षित झाली. अंजली तिचं सिक्रेट सांगताना म्हणाली की, ती एकदा रशियाला गेली होती, तेव्हा तिच्याकडे कोणाशी कनेक्ट व्हायला पैसे नव्हते आणि सिम कार्डसुद्धा नव्हतं. तेव्हा तिने कोणाकडे तरी पैसे मागितले आणि त्या बदल्यात ती त्या व्यक्तीबरोबर एका पार्टींमध्ये गेली. तिचं हे सिक्रेट सांगताच ती सुरक्षित झाली. त्यानंतर बॉटम 2 मध्ये सिद्धार्ध शर्मा आणि स्वामी चक्रपाणी महाराज होते, त्यातून स्वामी चक्रपाणी महाराज बाद झाले.
हेही वाचा : आलियाच्या ‘Gangubai Kathiawadi’चा बॉक्स ऑफिसवर कल्ला; 100 कोटींचा टप्पा केला पार