आपल्या अभिनया व्यतिरिक्त वादग्रस्त विधानांमुळे सतत चर्चेत असलेली अभिनेत्री म्हणजे कंगना रणौत. कंगनाला नुकतेच पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले. दरम्यान टाइम्स नाउ नवभारतला दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान कंगनाने केलेल्या विधानाने ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी तिने तिच्या ट्रोलर्सना चांगलीच चपकार दिली आहे. मुलाखतीदरम्यान कंगनाने म्हटले देशात काँग्रेसची सत्ता होती तेव्हा मला दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला होता. मी जेव्हा राष्ट्रवादावर भाष्य करते, सैन्याबद्दल बोलते देशाची संस्कृती प्रमोट करते तेव्हा मी भाजपचा अजेंडा चालवते असे म्हटले जाते. हा भाजपचा अजेंडा आहे असे का म्हटले जाते हा देशाचा अजेंडा आहे. देशाला १९४७ साली स्वातंत्र मिळाले असे आपण म्हणतो परंतु तेव्हा मिळालेले स्वातंत्र ही भीक होती देशाला खरे स्वातंत्र २०१४मध्ये मिळाले असे कंगनाने म्हटले आहे.
लकड़ी के घोड़े पर प्लास्टिक की तलवार लेकर वीरांगना बनने वाली सरकारी चाटुकार आजादी के सिपाहियों का अपमान कर रही है। हज़ारों कुर्बानियों के नतीजे को भीख बता रही है। pic.twitter.com/gH4JbOd4l9
— Rofl Gandhi 2.0 🚜🏹 (@RoflGandhi_) November 10, 2021
कंगनाच्या या वादग्रस्त विधानानंतर सोशल मीडियावर अनेक वादग्रस्त प्रतिक्रीय उमटल्या आहेत. रोफी गांधी या ट्विट युझरने कंगनाच्या मुलाखतीचा व्हिडिओ शेअर करत लाकडाच्या घोड्यावर प्लॅस्टिकची तलवार घेऊन बसणारी वीरांगना, सरकारची बोली घेऊन स्वातंत्र्य संग्रामातील वीरांचा अपमान करत आहे. देशासाठी हजारो भारतीयांच्या बलिदानांना भीक म्हणते, असे म्हटले आहे.
कंगना रणौतच्या या वक्तव्यावर भाजपचे संसदेतील वरुण गांधी देखील नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले की, राष्ट्रपिता माहात्मा गांधी, शहिद मंगल पांडे, राणी लक्ष्मीबाई, भगत सिंह, चंद्रशेखर आझाद, नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्यासह लाखो स्वातंत्र्य सेनानींचा कंगनाने अपमान केला आहे. कंगनाच्या या विचारांना वेडेपणा म्हणायचे की देशद्रोह?,असा सवाल वरुण गांधी यांनी केला आहे.
कभी महात्मा गांधी जी के त्याग और तपस्या का अपमान, कभी उनके हत्यारे का सम्मान, और अब शहीद मंगल पाण्डेय से लेकर रानी लक्ष्मीबाई, भगत सिंह, चंद्रशेखर आज़ाद, नेताजी सुभाष चंद्र बोस और लाखों स्वतंत्रता सेनानियों की कुर्बानियों का तिरस्कार।
इस सोच को मैं पागलपन कहूँ या फिर देशद्रोह? pic.twitter.com/Gxb3xXMi2Z
— Varun Gandhi (@varungandhi80) November 11, 2021
कंगानाने देखील वरुण गांधी यांच्या ट्विटला उत्तर देत म्हटले आहे की, मी १८५७च्या अयशस्वी ठरलेल्या देशाच्या स्वातंत्रता संग्रामाचा उल्लेख देखील केला होता. ज्या स्वातंत्रता संग्रामामुळे ब्रिटिशांचे अत्याचार आणि क्रूरतेमध्ये वाढ झाली होती. गांधीजींनी मागितलेल्या भीकेमुळे जवळपास १०० वर्षांनंतर आपल्याला स्वातंत्र मिळाले,असे तिने म्हटले आहे.
हेही वाचा – बीएमसी घरावर हातोडा मारताना सपोटर्स कुठे होते ? कंगनाला विचारलेल्या प्रश्नावर आले उत्तर