बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन नेहमीच चर्चेत असतात. आत्तापर्यंत जया यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक उत्कृष्ट चित्रपट केले आहेत. आपल्या अभिनयाबरोबरच जया बच्चन त्यांच्या स्पष्टवक्त्या स्वभावामुळेही ओळखल्या जातात. एक काळ असा होता जेव्हा जया बच्चन यांच्या खासगी आयुष्यात अनेक अडचणी आल्या होत्या. अशात ‘माझ्याकडे आता रडण्यासाठी देखील अश्रू नाहीत…’असं वक्तव्य जया बच्चन यांनी केलं होतं.
अमिताभ बच्चन यांनी रेखासोबत अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. लोकांनाही या दोघांची जोडी खूप आवडली. पडद्यावर दोघांची केमिस्ट्री पाहण्यासारखी होती. अमिताभ बच्चन, रेखा आणि जया बच्चन यांच्या ‘सिलसिला’ या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले होते. अमिताभ बच्चन यांनी जया बच्चनसोबत प्रेमविवाह केला पण त्यांच्या आणि रेखाच्या अफेअरचीही खूप चर्चा झाली होती.
‘सिलसिला’ सिनेमात जया बच्चन आणि रेखा यांना एकत्र कास्ट करण्याची इच्छा अमिताभ बच्चन यांची होती असं देखील सांगितलं जातं…एवढंच नाहीतर, यश चोप्रा यांची देखील अशीच इच्छा होती. तेव्हा सर्वत्र रेखा अमिताभ बच्चन यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगल्यामुळे सिनेमाचं शुटिंग काश्मीर येथे करण्यात आलं. चित्रपटाचे दिग्दर्शक यश चोप्रा यांनीही सेटवर जया बच्चन आणि रेखा यांच्यात भांडण होणार नाही याची काळजी घेतली होती. या दोन्ही सीनचे शूटिंग वेगवेगळ्या दिवशी करण्यात आले.
चित्रपटाच्या शूटिंगपासून मीडियाला दूर ठेवण्याचा प्रयत्न यश चोप्रा यांनी केला होता. एका रिपोर्टनुसार, सिनेमाच्या एका सीनमध्ये जया बच्चन यांना रडायचं होतं. सिनेमात रडण्याचा सीन असेल तर, कलाकार ग्लिसरीनचा वापर करतात. अशात रडण्याचा सीन असल्यामुळे जया बच्चन यांनी देखील ग्लिसरीनची मागणी केली.
जया बच्चन यांनी ग्लिसरीनची मागणी केल्यानंतर सेटवरील एक व्यक्ती म्हणाला, ‘तुम्ही उत्तम अभिनेत्री आहात, तुम्हाला ग्लिसरीनची काय गरज…’ यावर जया बच्चन यांनी दिलेलं उत्तर आजही चर्चेत आहे. तेव्हा जया बच्चन म्हणाल्या होत्या, ‘एवढी रडली आहे की आता रडण्यासाठी अश्रू शिल्लक नाहीत..’ जया बच्चन यांच्या उत्तराने चाहते हैराण झाले होते.
_______________________________________________________________________