घरट्रेंडिंगबच्चन कुटुंबात ऐश्वर्याचं करतेय सासुरवास,नणंदेचा आरोप

बच्चन कुटुंबात ऐश्वर्याचं करतेय सासुरवास,नणंदेचा आरोप

Subscribe

ती कधीच फोन कॉल्सना उत्तर देत नाही. तिने तयार केलेले टाईम शेड्यूल खूप बेकार आहे. त्यामुळे बऱ्याचदा अनेकांना त्रास होतो, असे श्वेता म्हणाली होती.

नात कोणतेही असो सासू सुन, नणंद भावजय. तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना. हे वाक्य प्रत्येक घरात ऐकायला मिळते.  यात बॉलिवूड कालाकारही कुठे मागे नाहीत. बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रॉय बच्चन परिवारातील सर्वांचीच लाडकी आहे. जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांच्याशी तिचे एक वेगळे नाते आहे. ऐश्वर्या नेहमीच ती आदर्श सून कशी आहे हे दाखवून देत असते. मात्र ऐश्वर्याचे तिच्या नणंदेशी काही जमत नाही. श्वेता बच्चनला काही ऐश्वर्याचा स्वभाव पटत नाही. या दोघींच्याही नात्यात असलेली दुरी दिसून येते. या नणंद भावजयमधील नात्याबद्दल खरी चर्चा रंगली ती म्हणजे कॉफी विथ करण या शोमध्ये. अभिषेक बच्चन आणि श्वेता बच्चन कॉफी विथ करण या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यावेळी श्वेताने तिच्या आणि ऐश्वर्याच्या नात्याबद्दल उलगडा केला होता. ऐश्वर्याच्या काही सवयींमुळे कधी कधी मला त्रास होतो असे श्वेता बच्चन म्हणाली होती.

- Advertisement -

श्वेता बच्चन असे म्हणाली की, फोन मेसेजला ऐश्वर्या कधीच रिप्लाय देत नाही ही तिची सर्वात वाईट सवय आहे. ती कधीच फोन कॉल्सना उत्तर देत नाही. तिने तयार केलेले टाईम शेड्यूल खूप बेकार आहे. त्यामुळे बऱ्याचदा अनेकांना त्रास होतो, असे श्वेता म्हणाली होती. ऐश्वर्याच्या वाईट सवयी सांगताना श्वेताने कधीच तिच्याबद्दल वाईट शब्द उच्चारले नाहीत. ऐश्वर्या आणि श्वेता बच्चन यांच्या नात्यातील या गोष्टी काही नवीन नाहीत. याआधीही त्यांच्या नात्याबद्दल अनेक गोष्टी पब्लिक झाल्या आहेत. आधीही कोणत्याही खास कार्यक्रमांच्यावेळी ऐश्वर्या आणि श्वेता बच्चन यांना एकमेकींना दुर्लक्ष करताना दिसल्या होत्या. नणंद भावजयामधील नात कसेही असले तरि त्याच्या परिणाम बच्चन कुटुंबियांवर होताना दिसतो.

- Advertisement -

ऐश्वर्या आणि श्वेता बच्चन यांच्या नात्यातील दुरावा अनेक वेळा समोर आला आहे. कोणत्याही लग्नात किंवा कार्यक्रमात जाताना ऐश्वर्या, अभिषेक आणि त्यांची मुलगी आराध्या हे वेगळे जातात. तर श्वेता अमिताभ आणि जया बच्चन यांच्यासोबत वेगळी जाते. दोघीही एकाच कार्यक्रमात जातात मात्र कधीच एकत्र दिसत नाहीत. आकाश अंबानी आणि श्लोक मेहता यांच्या लग्न सोहळ्यातही असाच प्रकार पहायला मिळाला होता.

नणंद आणि भावजय यांच्या भांडणात पुरुषांचे मात्र काही चालत नाही. बायको आणि बहिणीच्या भांडणाचा अभिषेक बच्चनवर कधीच काही परिणाम होत नाही. श्वेता बच्चन नेहमीच तिच्यामुळे ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्यात काही भांडणे होणार नाहीत याची काळजी घेते. या नणंद भावजमध्ये बिघडलेल्या नातेसंबंधाबद्दल सर्वांनाच माहिती आहे. मात्र त्या कधीच एकमेकिविषयी वाईट बोलत नाहीत. त्याच्यात मैत्री होऊ शकली नाही मात्र त्यांच्या असलेल्या नात्याचा दोघीही मान ठेवतात.


हेही वाचा – लवकरच श्रद्धा लग्नबंधनात!, वडील शक्ती कपूर यांनी केला ‘हा’ खुलासा

 

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -