घरमहाराष्ट्रआमची बांधिलकी सिल्व्हर ओक-मातोश्री अशा येरझारा घालत नाही; विखेंचा राऊतांना टोला

आमची बांधिलकी सिल्व्हर ओक-मातोश्री अशा येरझारा घालत नाही; विखेंचा राऊतांना टोला

Subscribe

आमची बांधिलकी कधी सिल्व्हर ओक तर कधी मातोश्री अशा अस्वस्थ येरझारा घालत नाही. आमची छाती फाडून पाहिली तर एका वेळी एकच नेता दिसेल. तुमची फाडून पाहिली तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार असे दोघेही दिसतील. तुमचा हा बेगडीपणा लोकांना चांगलाच कळतो. त्यामुळेच तुम्हाला फारसं गांभीर्यानं घ्यायचं नसतं हे आता लोकांना कळू लागलं आहे.

शिवसेनेचे मुखपत्र सामनातून थोरातांची कुरकुर नाहीच विखेंची टुरटुर असा अग्रलेख लिहत राधाकृष्ण विखे पाटलांवर निशाणा साधण्यात आला होता. विरोधी पक्षात बाटगे घुसले आहेत, अशा शब्दात टोला लगावण्यात आला होता. यावर आता राधाकृष्ण विखे पाटलांनी प्रत्युत्तर दिलं आहे. सामनातील टिकेनंतर भाजप आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी उत्तर दिले असून,आमची बाधिकली कधी सिल्व्हर ओक तर कधी मातोश्री अशा येरझरा घालत नाही असा टोला विखेंनी लगावला आहे. विखे पाटलांनी ‘सामना’ला पत्र लिहिलं आहे. शिवाय, त्यांनी सामनाचा पारदर्शक कारभार पाहता आपण माझं उत्तर छापाल ही अपेक्षा..! असं म्हटलं आहे.

“थोरातांची कुरकुर नाहीच! विखेंची टुरटुर! या शीर्षकाखाली शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना या दैनिकात आपण माझ्यावर थेट अग्रलेख लिहिलात याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो. आपल्याच शब्दात सांगायचं तर मी सध्या वनवासात आहे. वनवासात असलेल्या विखेंची तुम्हाला अग्रलेख लिहून दखल घ्यावी लागली हेही नसे थोडके. मी राजकारणापासून दूर राहिलेलेच बरे असा सल्लाही आपण दिला आहे. फक्त जनता जनार्दनाला साक्षी ठेवून एवढेच सांगू इच्छितो की मी आपल्या कृपेने राजकारणात आलेलो नाही. त्यामुळे आपल्या सल्ल्याने राजकारणापासून दूर जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही,” असं त्यांनी पत्रात म्हटलं आहे.

- Advertisement -

पुढे त्यांनी म्हटलं आहे, “मला, माझ्या मुलाला व आतापर्यंत माझ्या घराण्याला राजकारणात भरभरून प्रतिसाद देण्याचं काम नगर जिल्ह्यातील जनतेनं केलं आहे. आमची बांधिलकी त्या जनतेशी आहे. आमची बांधिलकी कधी सिल्व्हर ओक तर कधी मातोश्री अशा अस्वस्थ येरझारा घालत नाही. नगर जिल्ह्यातील जनतेशी विखे घराण्याची नाळ पक्की जुळलेली आहे. अर्धी नाळ आपल्या नेत्यासोबत आणि अर्धी नाळ शरदाच्या चांदण्यात भिजतेय असा दुटप्पीपणा कोण करतेय ते ही लपून राहिलेले नाही,” असा टोला विखे पाटलांनी संजय राऊतांना लगावला आहे.


हेही वाचा – शिवसेना भवनात कोरोनाचा शिरकाव; काही दिवसांसाठी शिवसेना भवन बंद

- Advertisement -

“बाळासाहेबांच्या काळात धारदार अग्रलेखांची परंपरा होती. तेव्हा खरे रोखठोक अग्रलेख असत. आजच्यासारखी लाचारी त्यावेळी नव्हती. आज शिवसेनेचे प्रवक्तेपद सोडून काँग्रेस समितीचे प्रवक्तेपद टाळेबंदीच्या काळात स्वीकारले का? आम्ही राजकीय पक्ष बदलले पण ज्या पक्षात राहिलो त्याचे निष्ठेनं काम केलं. आमची छाती फाडून पाहिली तर एका वेळी एकच नेता दिसेल. तुमची फाडून पाहिली तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार असे दोघेही दिसतील. तुमचा हा बेगडीपणा लोकांना चांगलाच कळतो. त्यामुळेच तुम्हाला फारसं गांभीर्यानं घ्यायचं नसतं हे आता लोकांना कळू लागलं आहे. एकीकडे राजभवनाबाबत धमकीवजा भाषा वापरायची आणि दुसरीकडे वाकून, लवून राजभवनावर कुर्निसात करायचा हे कोलांटउडीचे डोंबारी राजकारण आपण किती सहजगत्या करता हे अलीकडे महाराष्ट्राने बघितले आहेच,” असं विखे पाटलांनी म्हटलं आहे.

“मी भाजपमध्ये आनंदी आहे पण महाविकास आघाडी सरकारचा एक शिल्पकार असल्याच्या अविर्भावात राहणाऱ्या व्यक्तीला आपल्या भावास मंत्रीदेखील करू न शकल्याचं दुःख असेल आणि त्यातून आलेली कमालीची अस्वस्थता दाबून ठेवण्याचा नाहक त्रास होत असेल तर त्यात माझा काय दोष? थोरातांची कमळा असा काहीसा उल्लेख आपण अग्रलेखात केला आहे. कमळ हातात घेण्यासाठी रात्रीच्या अंधारात कोण, केव्हा, कुठे कशी चाचपणी केली होती हा एक वेगळा इतिहास आहे. ती चाचपणी यशस्वी झाली असती तर आपण केलेला उल्लेख कदाचित खरा ठरला असता. आज त्याच्या खोलात मला जायचे नाही. मातोश्रीविरुद्ध बंड करण्यासाठी कृष्णकुंजला कुणाची चिथावणी होती आणि कोणी वेळेवर यू-टर्न घेतले हा इतिहास अनेकांना माहिती आहेच; मी वेगळा काय सांगावं! असं विखे पाटलांनी पत्रात लिहिलं आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -