घरताज्या घडामोडीMNS In Mahayuti : राज ठाकरेंच्या भूमिकेला एकमेव आमदाराचा पाठिंबा; म्हणाले, उंची...

MNS In Mahayuti : राज ठाकरेंच्या भूमिकेला एकमेव आमदाराचा पाठिंबा; म्हणाले, उंची छलांग लगाने के लिये…

Subscribe

MNS महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा मंगळावारी दादरच्या शिवाजी पार्क मैदानात पार पडला. मनसेचा यंदा मेळावा पक्षातील नेतेमंडळ, कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा होता. कारण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी दिल्लीत जाऊन घेतलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीनंतर अनेक चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले होते.

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा मंगळावारी दादरच्या शिवाजी पार्क मैदानात पार पडला. मनसेचा यंदा मेळावा पक्षातील नेतेमंडळ, कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा होता. कारण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी दिल्लीत जाऊन घेतलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीनंतर अनेक चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले होते. त्यामुळे राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर राज ठाकरेंनी भाषणाच्या शेवटी मनसेची पुढील भूमिका काय असेल, याबाबत वक्तव्य केले. त्यानुसार, राज ठाकरेंनी राज्यातील महायुतीला बिनशर्थ पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. (MNS In Mahayuti MLA Raju Patil Supports To Leader Raj Thackeray Decision Was Teked At Shivaji Park)

गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेला अनेकांनी पाठिंबा दिला तर, काहींनी पक्षावर नाराजी व्यक्त करत पक्षाला रामराम ठोकला. मात्र राज ठाकरे यांच्या भूमिकेवर मनसेचे कल्याण विधानसभेचे आमदार राजू पाटील यांची भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागले होते. अखेर राजू पाटील यांनी आपलं मत एक्सवर (ट्विटर) शेअर केले आहे. त्यानुसार, मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनीही राज ठाकरे आणि त्यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – MNS : भाजपाला पाठिंबा देताच राज ठाकरेंना धक्का; पदाधिकाऱ्याचा राजीनामा

- Advertisement -

राज पाटील यांच्या ट्विटरवरील पोस्टमध्ये काय?

कालच्या साहेबांच्या भाषणानंतर बऱ्यापैकी शंका कुशंकांचं मळभ दूर झालं असावं. खरंतर साहेबांनी आपल्या भाषणात सांगितल्याप्रमाणे अंदाज बांधणाऱ्या लोकांनी कल्पनांचे इमले इतके भयानक आणि अतर्क्य बांधले होते की विचारता सोय नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून पक्षाची धुरा वाहताना भूमिका मांडणं हे सोशल मीडियावर कुणाच्या तरी वॉलवर जाऊन आपली मतं मांडण्याइतकं (टर उडवण्या इतकं) सोपं नसतं. भूमिका ठरायला वेळ लागतो, विचारविनिमय करावा लागतो, भविष्यातील वाटचालींचा अंदाज घ्यावा लागतो.

महाराष्ट्रातील एकूण राजकीय परिस्थितीबद्दल अत्यंत स्पष्ट शब्दांत राज ठाकरेंच्या शैलीत खरपूस समाचार घेतला गेला आहेच. परंतु आगामी निवडणुका या अखंड हिंदुस्थानच्या भविष्याची वाट ठरवणाऱ्या निवडणुका आहेत. विशेषतः आपला देश विकसनशील ते विकसित अशा संक्रमण अवस्थेतून जात असताना देशात नेतृत्व बदल होणे परवडण्यासारखं नाही आहे. (आणि समजा जरी धोका पत्करायचा म्हटला तरी पर्याय कोण आहे?) यांना पराभूत करून जिंकून कोणाला देणार आहोत? आमच्या आगरी भाषेत म्हण आहे ‘खायाची मोत, पुन मिशीला तेल’ अशी मोदींच्या विरोधकांची अवस्था.

यांच्या नेतृत्वात आपल्या देशाचं काय भलं होणार? शिवाय मोदींच्या कणखर निर्णयांनी देशाची प्रतिमा उजळली आहे. हे मी जेव्हा परदेशात गेलो होतो तेव्हा स्वतः अनुभवले आहे. खिळखिळी अर्थव्यवस्था ते पहिल्या पाचात जाऊ शकणारी अर्थव्यवस्था, 370 कलम रद्द करणे आणि माझ्या वैयक्तिक इच्छेतलं सर्वात महत्वाचं कार्य म्हणजे राम मंदिराचे निर्माण, देशातील डिजिटल क्रांती अशा अनेक गोष्टी विचारात घेतल्याच पाहिजेत.

राज ठाकरेंनी सांगितल्याप्रमाणे जे वाईट आहे त्यावर कोरडे ओढाच, पण चांगलं आहे त्याचं कौतुक करण्याची सर्वच राजकारण्यांनी सवय घ्यायला हवी. महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या हिताची आणि अस्मितेची बाजू उंचावणारा पक्ष आहेच पण सवाल जेव्हा देशाचा येतो तेव्हा प्राथमिकता हिंदुस्थानच असणार ना.

शिवाय आम्हा सर्व मनसैनिकांच्या आवडत्या शैलीत बोट उंचावून साहेबांनी सांगितलंच आहे. विधानसभेच्या तयारीला लागा. आणि शेवटचं पण महत्वाचं सांगतो. ‘उंची छलांग लगाने के लिये चिता भी दो कदम पीछे आता है |’


हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : भाजपची दहावी उमेदवार यादी जाहीर, पण या खासदारांचे नाव नाही, धाकधूक वाढली

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -