घरमहाराष्ट्रगणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यास आणखी ४० स्पेशल गाड्या सोडणार; रावसाहेब दानवेंची घोषणा

गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यास आणखी ४० स्पेशल गाड्या सोडणार; रावसाहेब दानवेंची घोषणा

Subscribe

कोकणातील पूर परिस्थितीतून मार्ग काढून रेल्वे लवकरात लवकर सुरु कशी करता येईल जेणेकरून मदत कार्याला वेग येण्यास मदत होईल. याबाबत तातडीने आढावा घेऊन रेल्वे अधिकाऱ्यांना सूचना करतानाच गणेशोत्सवासाठी अजून ४० गाड्यांचे नियोजन करण्याच्या सूचना रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी आज केल्या आहेत. गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यास रेल्वेने ७२ गाड्या सोडल्या आहेत. मात्र, कोकणात जाण्यासाठीचं आरक्षण हाऊसफुल्ल झाल्याने वेटिंग लिस्ट वाढली आहे. त्यामुळे कोकणात जाण्यासाठी अधिकच्या ४० फेऱ्या सोडण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली आहे. भाजपचे नेते आशिष शेलार यांनी दानवे यांची नुकतीच भेट घेऊन गणेशोत्सवात कोकणासाठी अधिकच्या गाड्या सोडण्याचा विनंती केली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

- Advertisement -

कोकणात रेल्वेची सेवा लवकर होणार सुरु

भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांच्यासह खासदार गोपाळ शेट्टी, मनोज कोटक यांनी आज नवी दिल्ली येथे रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेतली. यावेळी कोकणातील पुर परिस्थिती आणि रेल्वे, तसेच मुंबईत दरवेळी निर्माण होणारी पुर परिस्थिती आणि रेल्वेच्या दळणवळणावर होणारे परिणाम याबाबत चर्चा केली. याबाबत दानवे यांनी संबंधित अधिकारी व यंत्रणांची तातडीने आढावा घेऊन अधिकाऱ्यांना आवश्यकत्या सूचना दिल्या. कोकणात रेल्वेची सेवा लवकरात लवकर सुरु झाल्यास चिपळूण, संगमनेर आणि तळकोकणात मदत कार्याला वेग येईल त्यामुळे रेल्वे तातडीने पूर्ववत करण्यासाठी काम करण्यात यावे याबाबत आवश्यक सूचना त्यांनी केल्या. तसेच मुंबई बाबतीतही कायमस्वरूपी उपाययोजना सूचवण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.

गणेशोत्सवासाठी ११२ गाड्या उपलब्ध होणार

दरम्यान, कोकणात गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेने सोडलेल्या ७२ गाड्या फुल झाल्यामुळे अधिकच्या गाड्यांची मागणी आशिष शेलार यांनी केली होती. त्यानुसार अजून ४० गाड्या सोडण्याची घोषणा दानवे यांनी केली. त्यामुळे आता गणेशोत्सवासाठी ११२ गाड्या उपलब्ध होणार आहेत. तसेच त्यानंतरही जर प्रतिक्षा यादी वाढल्यास गाड्यांची संख्या लाढविण्यात येईल, असेही दानवे यांनी पत्रकार परिषदे घेऊन जाहीर केले आहे. कोकणवासीयांना तातडीने न्याय दिल्याबद्दल रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांचे आमदार शेलार यांनी आभार मानले आहेत.


रायगड तळीये गावात दरड कोसळून ३२ जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढणार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -