घरताज्या घडामोडी...रात्री झोपेपर्यंत फक्त शिव्याशाप देण्याचं काम सुरू, श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

…रात्री झोपेपर्यंत फक्त शिव्याशाप देण्याचं काम सुरू, श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

Subscribe

महाविकास आघाडीची छत्रपती संभाजीनगरमध्ये वज्रमूठ सभा पार पडली. राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्यानंतर ही पहिलीच संयुक्त सभा होती. या सभेला महाविकास आघाडीचे सर्व नेते उपस्थित होते. यावेळी या सभेतून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्यासह अनेक नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली. दरम्यान, शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

श्रीकांत शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत शिव्या देण्याचं काम होत असल्याचं श्रीकांत शिंदे म्हणाले. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती, राजकीय स्तर घसरल्याचं पाहायला मिळत आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत फक्त शिव्याशाप देण्याचं काम जात आहे. अशी परिस्थिती महाराष्ट्रानं कधीही पाहिली नव्हती, असं म्हणत श्रीकांत शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला.

- Advertisement -

मागील ९ महिन्यांपूर्वी राज्यात ज्या काही गोष्टी घडल्या. त्यामुळे सत्ताबदल झाला. कधी विचारही केला नव्हता की, अशा प्रकारच्या गोष्टी घडतील. पण त्यामुळेच आज हा सगळा थयथयाट पाहायला मिळत आहे. रोज कुणाला ना कुणालातरी शिव्या दिल्या जात आहेत. सध्याच्या राजकीय परिस्थितीत विकासाचा शब्दही काढला जात नाहीये. जे आज विराट सभा करत आहेत, त्यांनी गेल्या अडीच वर्षात नेमकं काय केलं?, हे त्या सभेतून आधी सांगायला पाहिजे, असंही श्रीकांत शिंदे म्हणाले.

नाशिकमध्ये एका कार्यक्रमाला उपस्थिती लावलेल्या श्रीकांत शिंदे यांनी आपल्या भाषणातूनही महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. ज्यांना खोक्यांची सवय आहे, त्यांना खोकेच दिसतात. मध्यंतरी आमदार सुहास कांदे यांनी केलेली नार्को चाचणीची मागणी रास्तच आहे, असं शिंदे म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : डान्स शिकवण्याच्या नावाखाली सुरू होता भलताच उद्योग, मल्ल्याळी डान्स टीचरला अटक


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -