घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रबीएमडब्ल्यू जळून खाक; रिक्षाचालकाचे प्रसंगावधान म्हणून अनर्थ टळला

बीएमडब्ल्यू जळून खाक; रिक्षाचालकाचे प्रसंगावधान म्हणून अनर्थ टळला

Subscribe

नाशिकरोड : भगूरच्या देवीच्या दर्शनासाठी जाणार्‍या भाविकांच्या कारने रविवारी (दि.२) रात्री 8.30 वाजेदरम्यान उपनगर नाका परिसरात अचानक पेट घेतला. मात्र, रिक्षाचालकाने प्रसंगावधान राखत कारचालकाला माहिती दिल्याने मोठा अनर्थ टळला. घटनास्थळी अग्निशमन दलाचा बंब येईपर्यंत कार पूर्णपणे जळून खाक झाली होती.

रविवारी (दि.२) रात्री साडे आठच्या सुमारास बीएमडब्ल्यू कार (एमएच ४६ एबी ००६९)मधून गोविंदनगर येथे राहणारे शशी हेमदानी (३६) हे त्यांचे आई, वडील, पत्नी इंदिरानगर परिसरातून भगूरच्या देवीच्या दर्शनासाठी जात होते. ते उपनगर नाका परिसरातून जात असताना सिग्नलवर वेग कमी झाला असताना बाजूने जात असलेला रिक्षाचालक निजामुद्दीन शेख याने हेमदानी यांना कारला खालून जाळ येत असल्याने थांबवण्यासाठी सांगितले. त्यानुसार कार बाजूला घेत सर्वजण गाडीतून सुखरुप बाहेर आले. कारला लागलेली आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला. बर्निंग कार पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी झाली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -