घरताज्या घडामोडीजीनचा जीव पोपटात अडकलाय म्हणून जीनची धडपड सुरू झालीय, नवाब मलिकांचे फडणवीसांना...

जीनचा जीव पोपटात अडकलाय म्हणून जीनची धडपड सुरू झालीय, नवाब मलिकांचे फडणवीसांना प्रत्युत्तर

Subscribe

जो जीन आहे (भूत) त्याचा जीव एका पोपटात होता, तो हाच पोपट तुरुंगात जाणार असल्याने जे राक्षसी विचाराचे भाजपचे लोक आहेत ते घाबरले आणि म्हणून आपलं प्रकरण बाहेर येवू नये यासाठी धडपड करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत आज केला. महाराष्ट्रातील जनतेला आणि महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे कटकारस्थान समीर वानखेडे याच्या माध्यमातून होत आहे हे पहिल्यादिवसापासून बोलत असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.

हे कटकारस्थान भाजपकडून सुरू आहे. राज्यातील सरकारला, मुंबईला, बॉलिवूडला बदनाम करून योगी महाराज नोएडामध्ये एक बॉलिवूड निर्माण करत आहे. त्यांना वाटतंय की बॉलीवूडला बदनाम केले की, बॉलिवूड बाहेर जाईल. परंतु त्यांना माहित नाही बॉलिवूड बनवण्यासाठी दादासाहेब फाळके, व्ही शांताराम आणि काही मराठी कलाकार व दिग्दर्शकांनी ओळख दिली आहे. बॉलिवूड देशाची संस्कृती आणि ओळख संपूर्ण जगात घेऊन जात आहे. बॉलिवूडच्या गाण्यातून लोक भारतदर्शन करतात. बॉलिवूडच्या माध्यमातून राज्यात, मुंबईत लाखो लोकांचा रोजगार चालतो. बॉलिवूडला बदनाम करुन योगी महाराज जर ‘युपीवूड’ करण्याचा विचार करत असतील तर त्यांचे स्वप्न स्वप्नच राहील असा इशाराही नवाब मलिक यांनी दिला.

- Advertisement -

मी आज नाव घेत नाही परंतु भाजपचे मोठमोठे नेते एनसीबीच्या कार्यालयात समीर वानखेडेला भेटायला जात आहेत. भाजपचे काही नेते त्यांचे राईटहँड समीर वानखेडेला भेटत आहेत हे जबाबदारीने सांगत असल्याचे सांगताना कालपासून या हालचाली वाढल्याचेही नवाब मलिक म्हणाले.

काशिफ खान कोण आहे याचा तपास किंवा शोध पत्रकारांनी घ्यावा. काशिफ खान हा क्रुझवरील ड्रग्ज पार्टीचा एक आयोजक होता. त्याचा सेक्स, ड्रग्ज, पोर्नोग्राफी याचे मोठे रॅकेट चालवतो परंतु त्याच्यावर कारवाई झाली नाही शिवाय १३०० लोकांचीही साधी चौकशी झाली नाही. रेव्ह पार्टी होणार याची कल्पना एनसीबीला होती. आयोजकांची माहिती होती. त्याची चौकशी का झाली नाही. क्रूझवर ड्रग्जची झाडाझडती का झाली नाही. समीर वानखेडे यांचे संबंध होते म्हणून चौकशी झाली नाही का? असे अनेक सवाल करतानाच काशिफ खान याच्याकडे कुणाकुणाची पैसे आहेत याची कसून चौकशी झाली तरहे सगळं बाहेर येईल असेही नवाब मलिक म्हणाले.

- Advertisement -

आज मी काही बोलणार नाही. जे काही हत्यारे माझ्याकडे राहू द्या. विधानसभेचे हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार आहे. विधानसभेच्या आधी बोललो तर लोकांना वेगळ्या पद्धतीने कोर्टकचेरी करतील परंतु अधिवेशनात जे काही माझ्यावर आरोप होणार आहेत त्याचं उत्तर देताना जे काही समोर आणणार आहे. त्यामुळे भाजपच्या नेत्यांना महाराष्ट्रात तोंड दाखवण्यास कठीण होऊन जाईल. त्या नेत्यांची नावे आज सांगत नाही माझ्यावर अधिवेशनात हल्ला झाल्यावर मोठमोठी नावे जाहीर करेन असा स्पष्ट इशाराही नवाब मलिक यांनी आज दिला.

या स्टोरीचा मध्यांतर झालाय. जो पकडून घेऊन जात होता तो तुरुंगात गेलाय. जी लोकं कालपर्यंत जामीन होऊ नये या भूमिकेत होते मात्र स्वतःला अटक होणार नाही ही परिस्थिती निर्माण झालीय. क्लायमॅक्स सुरू झाला आहे काल मध्यांतर झाला आणि आजपासून नवीन परिस्थिती निर्माण झाली. पिक्चरबाबत आता संजय राऊतजी यांनी नवाब मलिक यांच्या मध्यांतरनंतर मी बोलणार असे जाहीर केले आहे त्यामुळे सलीम-जावेद सारखं दोघांना मिळून काम करावं लागेल अशी मिश्किल टिप्पणी नवाब मलिक यांनी केली.

माझी शंभर कोटीची औकातच नाही. भाजपने माझा ब्रॅण्ड शंभर कोटीचा केला आहे. सगळं विकलं गेलं तरी माझ्याकडे शंभर कोटी होणार नाहीत. मला भंगारवाला बोलत आहेत त्यांना माहीत नाही भंगारवाला काय असतो. होय मी भंगारवाला आहे. माझ्या वडिलांनी मुंबईत कपडे आणि भंगाराचा व्यवसाय केला. मी वयाच्या सोळा वर्षापासून राजकारणात आमदार होईपर्यंत भंगाराचं काम करत होतो. मला माझ्या व्यवसायाचा अभिमान आहे असे ठामपणे नवाब मलिक यांनी आरोप करणार्‍या भाजपला सांगितले.


हेही वाचा – नवाब मलिक राष्ट्रवादीचे पोपट, त्यांना बोलण्याशिवाय दुसरं काम नाही – देवेंद्र फडणवीस


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -