घरट्रेंडिंगजनतेचा विश्वास पुन्हा जिंकणार; राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांचा दावा

जनतेचा विश्वास पुन्हा जिंकणार; राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांचा दावा

Subscribe

"आम्ही आता विरोधी पक्षात बसलो असून विरोधी पक्षाचे (Opposition Party) काम नक्कीच चांगले करू आणि महाराष्ट्रातील (Maharashtra) जनतेचा पुन्हा एकदा विश्वास जिंकू'', असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (NCP State President Jayant Patil) यांनी शुक्रवारी व्यक्त केला.

“आम्ही आता विरोधी पक्षात बसलो असून विरोधी पक्षाचे (Opposition Party) काम नक्कीच चांगले करू आणि महाराष्ट्रातील (Maharashtra) जनतेचा पुन्हा एकदा विश्वास जिंकू”, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (NCP State President Jayant Patil) यांनी शुक्रवारी व्यक्त केला. ‘महाविकास आघाडी म्हणून आम्ही तीन पक्ष एकत्र होतो. यापुढेही आम्ही एकत्र राहू आणि विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आमचा एकच उमेदवार असणार असेल’, असेही पाटील यांनी स्पष्ट केले. (NCP State President Jayant Patil talk on MVA government)

राज्यात झाल्रेल्या सत्तांतरामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसला (NCP) आता विरोधी बाकांवर बसावे लागणार आहे. या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी भवनात पत्रकारांशी बोलताना जयंत पाटील यांनी यापुढेही महाविकास आघाडी म्हणून तीनही पक्ष एकत्र राहणार असल्याचे स्पष्ट केले.

- Advertisement -

एकत्र बसून धोरण ठरवू

‘राज्यातील आघाडीचे सरकार गेल्यानंतर सरकार गेल्यानंतर आम्ही एकत्र बसून चर्चा केलेली नाही. परंतु पुढील काळात एकत्र बसून धोरण ठरवू. स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुकीत जिथे – जिथे शक्य होईल, तिथे तीनही पक्ष एकत्र येण्याचा प्रयत्न यशस्वी करु’, असेही जयंत पाटील म्हणाले.

- Advertisement -

‘शरद पवार यांना आयकर विभागाची नोटीस आल्याचे आम्हाला कालच समजले. गेल्या चार निवडणुकीत त्यांनी भरलेल्या प्रतिज्ञापत्राची माहिती मागविण्यात आली आहे. पवार साहेबांना नोटीस पाठविण्याऐवजी आयकर विभागाने जर निवडणूक आयोगाकडून ही माहिती घेतली असती तर त्यांना तिथून मिळाले असतीच. परंतु जाणीवपूर्वक यंत्रणांचा गैरवापर करुन प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोकांचा सुरु आहे’, असा आरोपही जयंत पाटील यांनी केला.

‘संजय राऊत यांना ईडीची नोटीस आली असून ते चौकशीला सामोरे गेले आहेत. ते निर्दोष असून राऊत यांच्याबद्दल आमच्या मनात कोणतीही शंका नाही. त्यामुळे राऊत यांच्याविरोधात ईडी जाणीवपूर्वक टोकाची भूमिका घेणार नाही’, अशी अपेक्षा जयंत पाटील यांनी व्यक्त केली.


हेही वाचा – काय तो पाऊस…’बीएमसी’ एकदम ओकेमध्ये; नवा व्हिडीओ पाहिलात का?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -