घरताज्या घडामोडीशिवसेनेत आग लावण्याचं काम माझं नाही - रावसाहेब दानवे

शिवसेनेत आग लावण्याचं काम माझं नाही – रावसाहेब दानवे

Subscribe

राज्य चालवण्यासाठी एकनाथ शिंदे सक्षम माणूस 

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत आज जालन्यात नांदेड-हडपसर-पूणे एक्स्प्रेसचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आणि जिल्ह्यातील पहिल्या किसान रेल्वेचा शुभारंभ करण्यात आला. या किसान रेल्वेच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्याचा ३५० टन कांदा यावेळी आसाममध्ये पाठवण्यात आला. कमी वाहतूक खर्च आणि कमी वेळेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता शेतीमाल बाहेरील राज्यात पाठवता येणार आहे. त्यामुळे किसान रेल शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे अशी माहिती रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिलीय.

मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन सर्व्हेक्षणाच काम सुरू

१ हजार कोटी रुपये खर्चून औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गाच दुहेरीकरण करणार असून या दुहेरी मार्गाच्या सर्व्हेक्षणाला सुरुवात झाल्याची माहिती देखील दानवे यांनी दिलीय. तर दुसऱ्या टप्प्यात औरंगाबाद ते नांदेड मार्गा चं दुहेरीकरण केलं जाईल असंही त्यांनी सांगितलं. जालना-खामगाव या रेल्वेमार्गासाठी अंतिम सर्व्ह करण्याचं काम सुरू आहे असंही दानवे यांनी स्पष्ट केलं. तर मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन सर्व्हेक्षणाच काम सुरू असून औरंगाबादमध्ये कार्यालयाचं काम सुरू करण्यात आलं असून आवश्यक जागा अधिग्रहण करण्याबाबत राज्य सरकारशी चर्चा केली जाईल असंही दानवे यांनी सांगितलं.

- Advertisement -

शिवसेनेत मी आग लावत नसून त्यांच्यात आग लावण्याचं काम माझं नाही. रावसाहेब दानवे यांनी आमच्यात आग लावण्याचं काम करू नये असं जरी एकनाथ शिंदे यांनी म्हटलं असलं तरी मनातली ईच्छा ते बोललेले नाहीत. त्यामुळे एकनाथ शिंदे हे अनुभवी नेते असून पुन्हा मुख्यमंत्री आजारी पडल्यास एकनाथ शिंदे यांच्याकडे राज्याचा चार्ज दिला पाहिजे, असं दानवे यांनी म्हटलं आहे.

रावसाहेब दानवेंचा राज्य सरकारला सल्ला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यामुळे ते फारसे बाहेर पडत नाहीत, यासाठी त्यांच्यावर विरोध पक्षाकडून टीका केली जात आहे. भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनीही याच मुद्यावरून मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. राज्याचे मुख्यमंत्री आजारी पडल्यास एकनाथ शिंदे यांच्याकडे राज्याचा चार्ज दिला पाहिजे, असा सल्ला रावसाहेब दानवेंनी राज्य सरकारला दिला आहे.

- Advertisement -

राज्य चालवण्यासाठी एकनाथ शिंदे सक्षम माणूस 

राज्य चालवण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्यासारखा माणूस सक्षम आहे. परंतु त्यांच्याकडे जबाबदारी दिली जात नाही. मग कोणालाही द्या राष्ट्रवादीला द्या किंवा अजित पवारांना द्या परंतु कोणाला तरी संधी दिली पाहिजे, असे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा : ५०० चौरस फुटापर्यंत मुंबईकरांच्या करमाफीला एवढा उशीर का लागला?, आशिष शेलारांचा राज्य सरकारला सवाल


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -