घरमहाराष्ट्रबीडमध्ये ३०० रुपयांच्या हिशेबावरुन वाद; पत्नीची हत्या

बीडमध्ये ३०० रुपयांच्या हिशेबावरुन वाद; पत्नीची हत्या

Subscribe

क्षुल्क कारणांवरुन पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना बीडमध्ये घडल्याचे समोर आले आहे.

क्षुल्क कारणांवरुन पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना बीडमध्ये घडल्याचे समोर आले आहे. फक्त ३०० रुपयांच्या हिशेबांसाठी पतीने चिमुकलीसमोर पत्नीची हत्या केल्याची घटना बीडमधील अंबेजोगाई तालुक्यातील सातेफळ शिवारात घडली आहे. याप्रकरणी आरोपी अशोक गुलाब नरसिंगे याला अटक करण्यात आली आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

नेमके काय घडले?

अंबेजोगाई तालुक्यातील सातेफळ शिवारात राहणारे नरसिंगे हे दाम्पत्यं वीट भट्टीवर काम करत. अशोक आणि दिपाली यांचा सुखाचा संसार सुरु होता. मात्र, या दाम्पत्यात अवघ्या ३०० रुपयांच्या हिशोबावरुन मंगळवारी रात्री वाद झाला. प्रसारमाध्यामांच्या वृत्तानुसार, १५ दिवसांपूर्वी अशोकने बाजार करण्यासाठी दिपालीला तीनशे रुपये दिले होते. त्याचा अशोकने पत्नीकडे हिशोब मागितला. त्यामध्ये दोघांमध्ये कडाक्याचा वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला कि, अशोकने आपल्या पाच महिन्याच्या लेकीसमोर पत्नीचा खून केला. पत्नीची हत्या केल्यानंतर परराज्यात पलायन करण्याच्या तयारीत असलेल्या अशोकला पोलिसांनी उस्मानाबाद जिल्ह्यातून अटक केली असून पोलिसांनी त्याला अवघ्या चार तासांत बेड्या ठोकल्या आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – जरीन खानला वेश्या बोलणं पडलं महागात


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -