घरठाणेमुंबईसह ठाणे, पालघर, रायगडमध्ये एनडीआरएफची एकूण 10 पथके तैनात

मुंबईसह ठाणे, पालघर, रायगडमध्ये एनडीआरएफची एकूण 10 पथके तैनात

Subscribe

हवामान खात्याकडून राज्यात 10 जुलैपर्यंत अतिवृष्टीच तर कोंकण विभागातील सर्व जिल्ह्यांना मुसळधार ते अति मुसळधार पवासाचा इशार दिला आहे. या पार्श्वभूमीवर

हवामान खात्याकडून राज्यात 10 जुलैपर्यंत अतिवृष्टीच तर कोंकण विभागातील सर्व जिल्ह्यांना मुसळधार ते अति मुसळधार पवासाचा इशार दिला आहे. राज्यात अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मंत्रालय नियंत्रण कक्ष सतर्क असून राज्यातील सर्व जिल्हा नियंत्रण कक्षांच्या संपर्कात आहे. मुंबईसह ठाणे, पालघर, रायगडमध्ये एनडीआरएफची एकून 10 पथके तैनात करण्यात आली आहेत.

पालघर –

- Advertisement -

कोंकण विभागातील पालघर जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 138 मिमी. पाऊस झाला असून, जिल्ह्यात पावसाचा जोर वाढत असल्याने आणि भारतीय हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली आहे. पालघर जिल्हा प्रशासन सतर्क असून मंत्रालय नियंत्रण कक्षाच्या संपर्कात आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात एनडीआरएफची एक टीम तैनात आहे

ठाणे –

- Advertisement -

ठाणे जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी ९५.७ मिमी. पाऊस झाला आहे. जिल्ह्यात कुठेही पुर परिस्थिती नाही.  सर्व नद्या इशारा पातळीच्या खाली वाहत आहेत. जिल्ह्यात सर्व प्रकारची वाहतूक सुरुळीत सुरु आहे. खबरदारी म्हणून जिल्ह्यात दोन एनडीआरएफच्या टीम तैनात आहेत.

मुंबईत –

मुंबईत गेल्या २४ तासात मुंबई कुलाबा येथे ११०.६ मिमी तर सांताक्रूझ येथे १२५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मात्र, अद्याप सर्व प्रकारची वाहतूक सुरळीत असल्याची माहिती मुंबई महानगरपालिका नियंत्रण कक्षाने दिली आहे. मध्य रेल्वे वरील वाहतूक धीम्या गतीने सुरु असून पश्चिम रेल्वे मार्ग सुरळीत आहे. मुंबई मध्ये एनडीआरएफच्या तीन टीम या आधीच तैनात आहेत. मात्र, खबरदारी म्हणून दोन अतिरिक्त टीम अशा एकूण पाच टीम तैनात करण्यात आल्या आहेत.

रायगड –

रायगड जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी १०६ मिमी. पाऊस झाला असून जिल्ह्यात कुठेही पूर परिस्थिती नाही. सावित्री, कुंडलिका तसेच इतर मोठ्या नद्या धोका पातळीच्या खाली वाहत आहेत. पोलादपूर, महाड व माणगाव येथील दरड प्रवण व पूर प्रवण भागातील ११५ कुटुंब म्हणजे एकूण २८९ व्यक्तींना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात दोन एनडीआरएफच्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत.

रत्नागिरी –

रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या २४ तासात १७३.४ मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली असून सद्यस्थितीत पूर परिस्थिती नाही. मात्र जिल्ह्यातील खेड येथील जगबुडी नदी व राजापूर तालुक्यातील कोदवली नदी इशारा पातळी वरून वाहत आहेत. या भागातील नागरिकांचे आवश्यकतेनुसार स्थलांतर करण्यात येत असून नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.वारंवार दरड कोसळण्याच्या घटना घडत असल्याने सुरक्षेच्या कारणामुळे मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाट सर्व प्रकारच्या वाहतुकीकरिता ०९ जुलै पर्यंत बंद करण्यात आला आहे. दरड प्रवण व पूर प्रवण भागातील १३६ कुटुंब म्हणजे एकूण ४७७ व्यक्तींना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात २ एनडीआरफ टीम तैनात करण्यात आल्या आहेत.

देशातील स्थिती –

देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. जम्मू आणि काश्मीरपासून मध्य भारत आणि दक्षिणेकडील राज्यांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. ढगफुटी, भूस्खलन, अतिवृष्टी आणि महापुराने दिवसभरात विविध राज्यांमध्ये सुमारे २० जणांचा मृत्यू झाला आहे.

९ जुलै : रेड अलर्ट

१० जुलै : ऑरेंज अलर्ट – मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर

८-११ जुलै : सोसाट्याचा वारा – कोकण आणि गोवा किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहेल.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -