घररायगडपालीचा विकास नगरपंचायत कधी करणार?; स्थानिकांचा सवाल 

पालीचा विकास नगरपंचायत कधी करणार?; स्थानिकांचा सवाल 

Subscribe

न्यायालयीन बाबी, राजकीय अनास्था आणि विरोध अशा अनेक अडचणींवर मात करत पाली ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर झाले. त्यानंतर गतसाली फेब्रुवारी महिन्यात पहिली नगरपंचायत प्रस्थापित झाली. त्यामुळे पालीकारांना विकासाची स्वप्न पडू लागली, शहरातील सोयीसुविधा आता आपल्याला मिळणार म्हणून सगळेच जण आनंदी होते. मात्र नगरपंचायतीला एक उलटून गेले तरी शहराचा अपेक्षेप्रमाणे विकास झाला नाही. उलट वर्षाच्या आतमध्ये पहिल्या नगराध्यक्षांनी अचानक राजीनामा दिला.

पाली: न्यायालयीन बाबी, राजकीय अनास्था आणि विरोध अशा अनेक अडचणींवर मात करत पाली ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर झाले. त्यानंतर गतसाली फेब्रुवारी महिन्यात पहिली नगरपंचायत प्रस्थापित झाली. त्यामुळे पालीकारांना विकासाची स्वप्न पडू लागली, शहरातील सोयीसुविधा आता आपल्याला मिळणार म्हणून सगळेच जण आनंदी होते. मात्र नगरपंचायतीला एक उलटून गेले तरी शहराचा अपेक्षेप्रमाणे विकास झाला नाही. उलट वर्षाच्या आतमध्ये पहिल्या नगराध्यक्षांनी अचानक राजीनामा दिला. परिणामी राजकीय उलथापालथ झाली. त्यानंतर नगराध्यक्ष पदासाठी घडामोडी झाली. शिवाय काही दिवसांपूर्वी सभापती पदासाठी देखील राजकीय कुरघोड्यांना उत आला होता. अशा अनागोंदीमुळे पाली नगरपंचायत अस्थिर झाली आहे. वेगवेगळ्या पक्षांचे नगरसेवक आणि लोकप्रतिनिधी कटकारस्थानात मश्गूल असल्याने स्थानिक प्रश्नांकडे कोणाचेच लक्ष नाही का?,पालीचा विकास नगरपंचायत कधी करणार? असे प्रश्न जनता करीत आहे.
ग्रामपंचायत असताना असणार्‍या कचरा, डम्पिंग ग्राउंड, सांडपाणी व्यवस्था, चांगले रस्ते, बस स्थानक, घनकचरा व्यवस्थापन, २७ कोटींची प्रलंबित शुद्धपाणी योजना अशा बहुतांश समस्या अद्यापही कायम आहेत. त्यामुळे या समस्यांनी ग्रासलेल्या शहराचा विकास होणार तरी कधी असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.
नगरपंचायत निवडणुकीत तत्कालीन मंत्री, नेते आणि पदाधिकार्‍यांनी मोठमोठी आश्वासने दिली होती. २७ कोटींची फिल्टर पाणी योजना आणतो, ब दर्जाचे पर्यटन स्थळ घोषित करतो अशी आश्वासने दिली होती. मात्र वर्षानंतर पालीकरांच्या तोंडाला पाने पुसली आहेत.

पाली नगरपंचायत हद्दीतील या समस्या सुटण्यासाठी पाली नगरपंचायत सर्व निवड लोकप्रतिनिधी राजकारण बाजूला ठेवून पालीच्या विकासासाठी एकत्र येणे नितांत आवश्यकता आहे.
– प्रकाश पालकर,
सामाजिक कार्यकर्ते, पाली

- Advertisement -

पालीकरांनी ज्या विश्वासाने आम्हा सर्वांना निवडून दिले आहे. त्यांच्या या विश्वासाला तडा न जाता शहरवासीयांनी विकासाचे जे स्वप्न पाहिले आहे. ते नक्कीच साकार करणार.
-अरिफ मनियार,
उपनगराध्यक्ष पाली नगरपंचायत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -