घरमहाराष्ट्र'धनंजय मुंडे यांच्या शब्दांमुळे राजकारण सोडावसं वाटतंय'

‘धनंजय मुंडे यांच्या शब्दांमुळे राजकारण सोडावसं वाटतंय’

Subscribe

बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघाचे राजकारण सध्या चांगलेच तापले आहे. धनंजय मुंडे यांच्या भाषणाची एक व्हिडिओ क्लिप काल संध्याकाळी व्हायरल झाल्यानंतर बीड जिल्ह्यातील राजकारणाचा नूरच पालटला आहे. आज सकाळी धनंजय मुंडे यांनी माध्यमांसमोर येऊन माझ्या वक्तव्याची क्लिप एडिट करुन व्हायरल केली असल्याचे मुंडे यांनी सांगितले. त्यानंतर आज पकंजा मुंडे आणि त्यांच्या कुटुंबियांनी लोकांसमोर येऊन आपली भावना व्यक्त केली. खासदार प्रीतम मुंडे म्हणाल्या की, “धनंजय मुंडे यांनी घाणेरड्या पातळीचे आरोप केल्यामुले पंकजाताई खिन्न झाल्या आहेत. हे आरोप त्यांना सहन झाले नाहीत. धनंजय मुंडेच्या वक्तव्यानंतर राजकारण सोडून द्यावे, अशी त्यांची भावना झाली असल्याचे प्रीतम मुंडे म्हणाल्या.

हे वाचा – धनंजय मुंडेंचाही इतिहास, भुगोल आम्हाला माहितीये – पंकजा मुंडे

प्रीतम मुंडे पुढे म्हणाल्या की, “आपल्या घरातील लेकींविषयी असे कुणी बोलले असते तर आपल्याला काय वाटलं असतं. या वक्तव्यामुळे पंकजा ताई उद्विग्न झाल्या आहेत. मात्र त्यांची उद्विग्नता समाजाला परवडणारी नाही, त्यामुळे पंकजाताईंनी आमच्यासाठी, समाजासाठी पुन्हा उभे राहावे, अशी आमची इच्छा आहे. या संघर्षाच्या काळात लोकांनी पाठिंबा दिला म्हणून सर्वांचे आभार”

- Advertisement -

यावेळी पंकजा मुंडे यांना धीर देण्यासाठी अनेक महिला जमलेल्या होत्या. “ताई खचायचं नाही, आम्ही आपल्या सोबत आहोत”, अशी भावना सर्व जमलेल्या महिलांनी व्यक्त केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -