घरमहाराष्ट्रनाशिकनांदूरमध्यमेश्वर धरणात मृतसाठाच

नांदूरमध्यमेश्वर धरणात मृतसाठाच

Subscribe

१५ ते २० दिवस पुरेल इतकेच पाणी; काटकसरीचे आवाहन

लासलगावसह १६ गावांसाठी पाणीपुरवठा करणार्‍या नांदूरमध्यमेश्वर धरणात पाण्याचा मृतसाठाच शिल्लक असून १५ ते २० दिवस पुरेल इतकेच पाणी मिळणार आहे. यामुळे नागरिकांना पाणी जपून वापरावे लागणार आहे. पुढील आवर्तन साधारण एक महिन्यानंतर मिळणार असल्याने मे आणि जून या महिन्यांत पाणी जपून वापरावे लागणार आहे. त्याचे नियोजन आत्तापासून केले, तरच जूनच्या अखेरीसपर्यंत पाणी पुरेल.

निफाड तालुक्यातील सर्वात मोठे धरण म्हणून नांदूरमध्यमेशवरची ओळख आहे. या धरणातून लासलगाव सह १६ गाव पाणी योजना, माळ साकोरे १२ गाव पाणी योजना तसेच विंचूर औद्योगिक वसाहतीसाठी व शेतकर्‍यांसाठी पाणी पुरवठा केला जातो. ग्रामीण भागातील जनतेला दरवर्षीच्या उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागते. उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन होत नसल्याने कमी-अधिक प्रमाणात अशी स्थिती सर्वत्रच दिसते. तालुक्यात दोन-तीन वर्षांपासून जलसंधारण अभियान सुरू आहे. यात जलयुक्त शिवार, शेततळी निर्माण करण्यात आली आहेत. तर बंधारे, नदी, कालवा, तलाव आदी ठिकाणी खोलीकरण करून त्यातील गाळ काढणे व पाणी साठवण क्षमता वाढण्यासाठी दरवर्षी जोरदार उपक्रम राबविले जातात ही कौतुकास्पद बाब आहे. मात्र, या अभियानापेक्षाही सद्यस्थितीत धरणातील पाण्याचे नियोजन करणे महत्त्वाचे आहे.

- Advertisement -

यंदा होळीच्या आधीपासूनच वातावरणात उष्णता जाणवू लागली होती. पारा 35 अंशाच्यावर गेल्याने गुढीपाडव्यानंतर सूर्य आग ओकत आहे. यामुळे धरणातील पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होणार आहे. यामुळे धरणातील पाण्याची पातळी घटणार यात तिळमात्र शंका नाही. यंदा ही स्थिती निर्माण होऊ नये, यासाठी सगळ्यांनी पाणी जपूनच वापरले पाहिजे.

आवर्तनाचे नियोजनाची गरज

उन्हाळा वाढला की शेतकरी शेतीसाठी आवर्तनाची मागणी करू लागतात व प्रशासनावर दबाब आणतात. यामुळे प्रशासनही पाणी सोडते. परंतु, पाणी सोडताना ते किती प्रमाणात आणि किती सोडले पाहिजे याचे नियोजन हवे. नाहीतर शेतीला पाणी आणि पिण्याच्या पाण्यासाठी मात्र वणवण, अशी स्थिती दरवर्षी पहावयास मिळते. ती यंदा होऊ नये, यासाठी धरणातील पाण्याचे नियोजन महत्त्वाचे ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -