घरCORONA UPDATEलॉकडाऊननंतर बदलणार शाळांचे नियम; वाचा काय होणार!

लॉकडाऊननंतर बदलणार शाळांचे नियम; वाचा काय होणार!

Subscribe

कोरोनामुळे अनेक संदर्भ बदलणार असल्याची चर्चा वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत असताना आता शाळा, कॉलेज यांच्यासाठी नवी नियमावली तयार करण्याच्या सूचना केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने दिल्या आहेत. यामध्ये लॉकडाउननंतर शाळा, कॉलेजे उघडतील तेव्हा दोन विद्यार्थ्यांमध्ये अंतर ठेवणे, वसतिगृह, खानवळ आणि वाचनालयासाठी नवी नियमावली बनवण्याचे आदेश दिले असल्याचे सूत्रांकडून समजते. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने करोनानंतर शाळा, कॉलेज सुरू होतील तेव्हा वर्गात सुरक्षा उपायांबाबत एक समिती नेमली होती. या समितीने या शिफारशी केल्याचे समजते. विद्यापीठ अनुदान आयोगाने ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचे जाहीर केले आहे. मात्र शाळांबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. मात्र बहुतांश शाळा ऑनलाइन भरवाव्यात अशी सूचना केंद्रीय मंत्रालयाने केली आहे. शाळा, कॉलेजांतील सुरक्षेबाबत स्थापन केलेल्या सिमितीने विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी यांच्या सुरक्षेबाबत काही नियमावली तयार केली आहे.

नियमावलीत काय आहे?

नियमावलीमध्ये संस्थांनी त्यांच्या वेळापत्रकात तसेच वर्ग नियोजनात लवचिकता ठेवणे अपेक्षित आहे. दोन विद्यार्थ्यांमध्ये किमान सहा फुटांचे अंतर असणे अपेक्षित आहे. तसेच संपूर्ण संस्थेत सामजिक वावराचे नियम पाळले जातील असेही यात सूचित केले आहे. हे सर्व नियम पाळण्यासाठी गरज असल्यास एका दिवशी एका इयत्तेचे वर्ग भरवणे, व्हर्च्युअल क्लासरूम, मैदानांमध्ये तसेच शाळांच्या बसमध्ये विद्यार्थ्यांना ने-आण करताना सुरक्षित वावराचे नियम पाळणे आवश्यक राहणार आहे. तसेच स्वच्छतागृहातही सुरक्षा उपाय कसे पाळावेत याबाबात नेमके काय करायचे काय नाही करायचे? याबाबतची नियमावली तयार केल्याचेही सूत्रांनी सांगितले. तसेच शाळेच्या गणवेशामध्ये मास्कचा समावेश करण्याची सूचनाही करण्यात आली आहे. तर निवासी शाळांमध्ये वस्तीगृह, खानावळ येथे सामाजिक वावर नियमांचे पालन करावे असेही सूचित करण्यात आले आहे. आयआयटीसारख्या संस्थांमध्ये वर्ग दिवसातून दोन वेळा भरवण्यापासून विविध पर्यायांचा विचार सुरू आहे. तर ऑनलाइन वर्गावरही विशेष भर देण्याबाबत विचार सुरू आहे.

- Advertisement -

मुंबईत हे अवघड?

मुंबईतील पालिका शाळा तसेच इतर शाळांमध्ये एका वर्गात किमान ६० विद्यार्थ्यांचा पट तरी असतो. याचबरोबर अनेक शाळांमध्ये एका वर्गात १२ ते १३ विद्यार्थीच बसू शकतात. यामुळे मुंबईत हे सर्व अवघड होणार असून याबाबत शासनाने योग्य ते मार्गदर्शन करावे असे मत हंसराज मोरारजी हायस्कूलचे शिक्षक उदय नरे यांनी व्यक्त केले. याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -