हिंदू धर्मात विविध सण-समारंभ मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. पितृ पक्ष संपला की अश्विन महिन्याची सुरूवात होते. अश्विन महिन्याच्या सुरूवातीलाच अश्विन नवरात्र सुरू होते. हिंदू धर्मात अश्विन नवरात्रीला महत्वाचे स्थान प्राप्त आहे. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये देवीच्या 9 विविध रूपांची पूजा केली जाते. संपूर्ण वर्षभरात एकूण चार नवरात्री असतात. पहिली नवरात्री चैत्र महिन्यात असते तर शारदीय नवरात्री जी अश्विन महिन्यात साजरी केली जाते आणि इतर दोन नवरात्री ह्या गुप्त स्वरूपात असतात. परंतु चैत्र आणि अश्विन नवरात्रीला भारतात मोठ्या प्रमाणात साजरी केले जाते.
दरम्यान, आता लवकरच शारदीय नवरात्र सुरू होणार आहे. ही नवरात्र अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून नवमीपर्यंत साजरी केली जाते. हिंदू पुराणांच्या मते, नवरात्रीच्या 9 दिवसांच्या काळात देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. तसेच नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते. दरम्यान, नवरात्रीच्या काळात अनेक नियम पाळले जातात.
नवरात्रीच्या काळात चुकूनही करू नका ‘या’ चार गोष्टी
- घर बंद ठेऊ नका
नवरात्रीच्या दिवसात तुमच्या घरामध्ये घटस्थापना झाली असेल तर, या काळात तुम्ही तुमचे घर बंद ठेऊ नका. घरामध्ये सतत कोणीतरी असायला हवं. तसेच या काळात दिवसाचे झोपू नका. - मुलींना ठेवा खूश
हिंदू धर्मामध्ये मुलींना देवीचे रूप मानले जाते. या दरम्यान चुकूनही मुलींचे मन दुखवू नका. शास्त्रामध्ये मुलींचा अपमान केल्याने देवी रागावतात. फक्त मुलीच नाही तर नेहमीच सर्व स्त्रियांचा आदर करावा. - वादविवादापासून दूर राहा
नवरात्रीमध्ये मन शांत आणि स्वच्छ ठेवायला हवं. या काळात कोणावरही चिडू नये. घरामध्ये कलह करू नये. नाहीतर अशा ठिकाणी देवी लक्ष्मी वास करत नाही. - कांदा, लसूण आणि मासांहार करू नये
नवरात्रीच्या काळात कांदा, लसूण आणि मासांहार करू नये. नवरात्रीत यांचे सेवन करणं अपवित्र मानले जाते.
हेही वाचा :