घरमहाराष्ट्रलग्नासाठी निघालेल्या कारला अपघात; ५ जणांचा मृत्यू

लग्नासाठी निघालेल्या कारला अपघात; ५ जणांचा मृत्यू

Subscribe

कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे कार पुलावरुन खाली कोसळली. कार मुरुड-अकोला पाटीजवळ असणाऱ्या पुलावरून खाली कोसळली.

लातूरमध्ये भरधाव कार पुलावरुन कोसळल्याची घटना घडली आहे. या अपघातामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. लातूरच्या दिशेने भरधाव वेगात ही कार येत होती. दरम्यान मुरुड अकोला पाटीजवळ हा अपघात झाला आहे. लातूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातातील जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर अपघातातील मृत व्यक्तींचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले.


हेही  वाचा – साताऱ्यात तीन अपघातात २ ठार; १२ जखमी

- Advertisement -

कारवरील नियंत्रण सुटले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील मौजे डिकसळ येथे राहणारे ७ जण आज लातूरला लग्नासाठी येत होते. लातूर शहरातील १२ नंबर पाटीवर लग्नसोहळा होता. या लग्नसोहळ्याठी कार लातूरच्या दिशेने भरधाव वेगात येत होती. कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे कार पुलावरुन खाली कोसळली. कार मुरुड-अकोला पाटीजवळ असणाऱ्या पुलावरून खाली कोसळली.

जखमींवर उपचार सुरु

कार पुलावरुन खाली कोसळल्यामुळे कारचा चक्काचूरा झाल आहे. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातामध्ये २१ वर्षाच्या परमेश्वर अंबीरकर, २६ वर्षाच्या ज्ञानेश्वर खंदारे, ३० वर्षाच्या जगन्नाथ पवार, ३२ वर्षाचे गणेश सोमासे आणि जरीचंद शिंदे यांचा मृत्यू झाला आहे. तर २८ वर्षिय दत्ता जाधव आणि २८ वर्षिय श्रीकांत अंबीटवार जखमी झाले आहेत. दोन्ही जखमींवर लातूरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -