घरट्रेंडिंगम्हणून नथुराम गोडसेनं महात्मा गांधीजींची हत्या केली

म्हणून नथुराम गोडसेनं महात्मा गांधीजींची हत्या केली

Subscribe

दिल्लीच्या बिर्ला भवन येथे ३० जानेवारी १९४८ रोजी नथुराम गोडसेने महात्मा गांधींवर धडाधड तीन गोळ्या झाडून त्यांची हत्या केली होती.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची ३० जानेवारी १९४८ रोजी हत्या करण्यात आली होती. महात्मा गांधी हे अहिंसेचे पुजारी होते. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. तरीदेखील त्यांची हत्या करण्यात आली. दिल्लीच्या बिर्ला भवन येथे प्रार्थनेसाठी गेलेल्या महात्मा गांधींवर नथुराम गोडसे या माथेफिरूने गोळ्या झाडून हत्या केली. नथुराम गोडसेने अगोदर महात्मा गांधी यांचे चरण स्पर्श करण्याचे नाटक केले. त्यानंतर गांधीजींवर धडाधड तीन गोळ्या झाडल्या. या हल्ल्यामध्ये महात्मा गांधी यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर नथुराम गोडसेने स्वत:ला पोलिसांच्या स्वाधिन केले. परंतु, अहिंसेचे पुजारी महात्मा गांधी यांची हत्या का करण्यात आली? हा प्रश्न आजही भारतीयांना सतावत आहे. नथुराम गोडसे यांनी महात्मा गांधीवर गोळ्या झाडून जरी त्यांची हत्या केली असली तरी महात्मा गांधी हे त्यांच्या विचारांनी जगभरात लाखो लोकांच्या हृदयात आजही जिवंत आहेत. याच पार्श्वभूमीवर नथुराम गोडसेंनी महात्मा गांधींवर का गोळ्या झाडल्या? याविषयी जाणून घेऊयात.

नथ्थुराम गोडसे कट्टर हिंदुत्ववादी

भारत-पाकिस्तान फाळणी झाल्यानंतर पाकिस्तानला भारताकडून ५५ कोटी रुपये देण्यात यावे, अशी मागणी पाकिस्तानने केली होती. पाकिस्तानची ही मागणी भारताने नाकारली होती. पाकिस्तानला ५५ कोटी रुपये देण्यात यावे, यासाठी महात्मा गांधी यांनी उपोषण केले. त्यामुळे गांधीजींच्या अग्रहाखातर भारताला पाकिस्तानला ५५ कोटी रुपये द्यावे लागले. दरम्यान, याच काळात हिंदू-मुस्लिम वाद चिघळला होता. पाकिस्तानमधून भारताकडे येणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये शेकडो हिंदूंचे प्रेत दररोज येत होते.

- Advertisement -

गांधीजींच्या ‘या’ निर्णयावर नथुराम गोडसेच्या मनात द्वेष

भारत-पाकिस्तान फाळणी दरम्यान, महात्मा गांधी यांनी हिंदू-मुस्लिम यांच्या वास्तव्याविषयी महत्त्वाचा निर्णय घेतला होता. जे हिंदू पाकिस्तानात वास्तव्यास असतील आणि त्यांची इच्छा पाकिस्तानात राहायची असेल तर ते तिथेच कायमस्वरुपी राहू शकतात. त्याचप्रकारे जे मुस्लिम भारतात राहत असतील आणि त्यांची भारतातच राहण्याची इच्छा असेल, तर तेदेखील भारतात कायमस्वरुपी राहू शकतात, असा निर्णय गांधीजींनी घेतला होता. याच निर्णयांवर नथुराम गोडसेच्या मनात गांधीजींबाबत द्वेष निर्माण झाला. नथुराम गोडसे हा कट्टर हिंदुत्ववादी होता. महात्मा गांधी हे मुस्लिम धर्माच्या भल्यासाठी निर्णय घेत आहेत, असा समज नथुराम गोडसेचा झाला आणि यातूनच त्याने महात्मा गांधी यांच्या हत्येचा कट रचला. दिल्लीच्या बिर्ला भवन येथे ३० जानेवारी १९४८ रोजी नथुराम गोडसेंने महात्मा गांधींवर धडाधड तीन गोळ्या झाडून नथुराम गोडसेने गांधीजींची हत्या केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -