घरठाणे'घरोघरी तिरंगा'उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हा...ठाणे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

‘घरोघरी तिरंगा’उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हा…ठाणे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

Subscribe

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी खास देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन १५ ऑगस्ट रोजी केल्याची माहिती जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी दिली.

ठाणे: देशभरात ७५ स्वातंत्र्य दिनानिमित्त उत्साहाचे वातावरण तयार आहे. स्वातंत्र्यच्या अमृत महात्सवाचा उत्साह देशभरातच पाहायला मिळत आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नागरिकांमध्ये देशाभिमान जागृत करण्यासाठी उद्या १३ ऑगस्ट पासून सुरू होणारे ‘घरोघरी तिरंगा’(gharoghari tiranga) अभियानात जिल्ह्यातील नागरिकांनी उत्स्फुर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी खास देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन १५ ऑगस्ट रोजी केल्याची माहिती जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी दिली.

हे ही वाचा – ‘हर घर तिरंगा’ अभियान भारताला नव्या उंचीवर नेईल, मोदींकडून जनतेच्या उत्साहाचं कौतुक

- Advertisement -

ठाणे जिल्ह्यात ९ ऑगस्टपासून ‘स्वराज्य महोत्सवास’ प्रारंभ झाला असून त्यामध्ये जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, जिल्ह्यातील सर्व महापालिका, नगरपरिषद, ग्रामपंचायती यांसोबतच विविध संस्थांनी सहभाग नोंदविला आहे. विद्यार्थ्यांच्या प्रभातफेरी, पोलिस आणि क्रिडा विभागाच्या वतीने आयोजित मॅरेथॉन, रॅली, शहर आणि जिल्ह्यातील कार्यालये आणि ऐतिहासिक वास्तूंना केलेली रोषणाई, वृक्षारोपण आदी विविध उपक्रमांमुळे वातावरण भारावून गेल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. स्वराज्य महोत्सवा निमित्त अनेक विभागांनी कल्पक उपक्रम राबवून अमृत महोत्सवी कार्यक्रमात सहभाग घेतला आहे. जिल्ह्यातील भातसा आणि तानसा या धरणातील विसर्गावर तिरंगा रोषणाईची अभिनव संकल्पना साकारणारा ठाणे जिल्हा पहिला असेल. असे त्यांनी सांगितले. याकामी पुढाकार घेणाऱ्या जलसंपदा विभागाच्या अभियंता आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक करतो. जिल्ह्यात स्वराज्य महोत्सव उपक्रमात कार्यक्रमांची रेलचेल असून नागरिक उत्साहाने त्यात सहभागी होत आहेत.

हे ही वाचा – राज्यातील रेल्वे स्थानकांवर स्वातंत्र्यलढ्याचे विविध पैलू प्रदर्शित करणाऱ्या छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन

- Advertisement -

गडकरीरंगायतनमध्ये देशभक्तीपर गीतांचा साज

‘स्वराज्य महोत्सव’अंतर्गत जिल्हा प्रशासनामार्फत २१ विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यातील एक आगळावेगळा उपक्रम म्हणजे देशभक्तीपर गीतांचा जागर हा कार्यक्रम असून जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी खास त्याचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार १५ ऑगस्ट रोजी सकाळी दहाच्या सुमारास गडकरी रंगायतन येथे हा कार्यक्रम होणार आहे. असे जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी सांगितले.

स्वयंस्फूर्तीने घरांवर तिरंगा फडकवावा

१३ ऑगस्ट पासून ते १५ ऑगस्ट या कालावधीत नागरिकांनी घरे, शासकीय, निमशासकीय, खासगी आस्थापना, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था यांच्या इमारतींवर राष्ट्रध्वजाची स्वयंस्फुर्तीने उभारणी करण्यासाठी ‘घरोघरी तिरंगा’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. नागरिकांनीही त्यात स्वयंस्फूर्तीने सहभाग घेऊन घरावर तिरंगा ध्वज लावावा, असे आवाहन नार्वेकर यांनी केले.

हे ही वाचा – संतापजनक! भाजपाने वाटलेल्या तिरंग्यावर पक्षाचे नाव आणि चिन्ह, सचिन सावंतांनी ट्विट केला व्हिडीओ

इतरही कार्यक्रमांची रेलचेल

ठाणे महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने उत्सव ७५ ठाणे या उपक्रमांतर्गत विविध स्पर्धा, मान्यवरांच्या मुलाखती, टॉक शो आदी विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने स्वराज्य महोत्सव याअंतर्गत गावागावात प्रभात फेरी, शालेयस्तरावर निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, प्रश्न मंजुषा, पालक शिक्षक सभा यांचे आयोजन करण्यात आले. महिलांसाठी मेळावे, महिला बचत गटांसाठी मार्गदर्शन, स्वच्छता मोहिम आदी विविध उपक्रम जिल्हा परिषदेच्या वतीने राबविण्यात येत आहेत.

हे ही वाचा – हर घर तिरंगा अभियान; शनिवारपासून तीन दिवस घरांवर तिरंगा फडकवा, विनोद तावडे यांचे आवाहन

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -