केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात भारतीय रेल्वेसाठी मोठी घोषणा केली आहे. या अर्थसंकल्पात भारतीय रेल्वेसाठी 2.40 लाख कोटींची तरतूद केली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी 2.40 लाख कोटी रुपयांचा भांडवली खर्च जाहीर केला आहे. यासह देशात हायस्पीड ट्रेन्सची संख्या वाढवली जाणार आहे. यासह अहमदाबाद – मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्प सुरु करण्यावर भर दिला जाणार आहे.
रेल्वेसाठी जाहीर केलेला 2.40 लाख कोटी रुपयांचा भांडवली खर्च हा आतापर्यंतचा सर्वाधिक म्हणजे 2013-14 या आर्थिक वर्षात केलेल्या खर्चाच्या नऊ पट आहे. रेल्वेला दिलेला हा आतापर्यंतचा सर्वाधिक निधी आहे. यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यावर आणि पायाभूत सुविधांच्या विकासावरही भर दिला जाणार आहे. यात हायस्पीड ट्रेन्स लवकरच सुरू करण्यावर भर दिला जाईल. असंही सीतारामन म्हणाल्या.
Capital outlay of Rs 2.40 lakh crore has been provided for #Railways; This highest ever outlay is about nine times the outlay made in FY 2013-14#AmritKaalBudget #Budget2023 pic.twitter.com/t2VkKM2fkP
— PIB India (@PIB_India) February 1, 2023
रेल्वेतील नवीन योजनांसाठी 75 हजार कोटींची घोषणा
यासह रेल्वेतील नवीन योजनांसाठी 75 हजार कोटींची घोषणा केली आहे. यावर निर्मला सीतारामन म्हणाल्या की, अमृत काळातील हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. 2022-23 मध्ये रेल्वेच्या कायापालटासाठी 2.4 लाख कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तरतूद करण्यात आली होती.
या निधीतून रेल्वेचे नवीन ट्रॅक तयार करणे, हायस्पीड वंदे भारत गाड्यांची संख्या वाढवणे, हायड्रोजनवर चालणाऱ्या गाड्या तसेच अहमदाबाद – मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्प सुरु करणे यावर भर दिला जाणार आहे.