बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन ‘दो और दो प्यार’ या नवीन चित्रपटामुळे चर्चेत आहे. नवीन चित्रपट रिलीज होण्यापूर्वी विद्या बालनने एक मुलाखत दिली आहे. ‘द इंडियन एक्सप्रेस’च्या (The Indian Express) ‘एक्सुप्रेसो’ या कार्यक्रमाच्या पहिल्याच भागात विद्या बालन (Vidya Balan) आणि प्रतीक गांधी (Pratik Gandhi) यांनी हजेरी लावली होती.
चित्रपट फ्लॉप होत असल्याबद्दल विद्या बालन म्हणाली, “माझे सतत चित्रपट फ्लॉप होत होते. तेव्हा लोकांनी मला ट्रोल करायला सुरुवात केली होती. एका दिग्दर्शकाने थेट चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मला रिप्लेस केलं होतं. अभिनय, डान्स येत नसल्याचे सांगत मला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. पण त्यावेळी माझं कुटुंब माझ्यासोबत होतं. त्यांचा पाठिंबा खूप महत्त्वाचा होता. पुढे ‘मुन्नाभाई’ या चित्रपटाच्या माध्यमातून मी स्वत:ला सिद्ध केलं”.
नेपोटिज्मवर विद्या बालन म्हणाली….
मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली, ‘मला नाही माहिती यावर मी काय उत्तर देऊ कारण नेपोटिज्म आणि नेपोटिज्म शिवाय आज मी याठिकाणी आहे. ‘इंडस्ट्री कोणाच्या बापाची नाही. नाहीतर आज प्रत्येक बापाची मुलगी, मुलगा यशस्वी असता…’ पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘मी माझं काम करुन आनंदी आणि समाधानी आहे… अनेकदा मला असं वाटलं की, मला देखील लोकांचा आधार मिळाला असता, तर त्यांची माझ्या प्रति वागणूक योग्य असती. पण मला वाटतं की याचा खरंच काही फरक पडत नाही.’
Past रिलेशनशिपबद्दल विद्याचा खुलासा
हार्टब्रेक आणि पास्ट रिलेशनशिपबद्दल विद्या बालन म्हणाली, ‘प्रेमात माझी फसवणूक झाली आहे. मी ज्या मुलाला डेट केलं होतं, त्याने माझी फसवणूक केली… तो प्रचंड वाईट होता…’, विद्या हिने सिनेमा निर्माते सिद्धार्थ रॉय कपूर यांच्यासोबत लग्न केलं आहे. अभिनेत्री आता तिच्या वैवाहिक आयुष्यात आनंदी आहे.
प्रतीक गांधी आणि विद्या बालन पहिल्यांदाच ‘दो और दो प्यार’ या चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. या चित्रपटात इलियाना डिक्रूज आणि सेनडिल रामामूर्तीदेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. शिरशा गुहा ठाकुरताने या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. हा चित्रपट 19 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.
_________________________________________________________________