घरमहाराष्ट्रअमिताभ बच्चन यांची पूरग्रस्तांना ५१ लाखांची मदत

अमिताभ बच्चन यांची पूरग्रस्तांना ५१ लाखांची मदत

Subscribe

अमिताभ बच्चन यांनी पूरग्रस्तांना ५१ लाखांची मदत केली आहे.

पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे अनेक संसार उद्धवस्त झाले आहेत. कोल्हापूर, सांगली भागातील पाणी हळूहळू ओसरत आहे. मात्र, या भागातील नागरिकांचे पूनर्वसनाचे मोठे आव्हान राज्य सरकारकला आहे. दरम्यान, पूरग्रस्तांना मदतीसाठी सर्वसामान्य जनता, सामाजिक संस्था पुढे आल्या होत्या. त्याचबरोबर पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मराठी कलाकारही पुढे आले. मराठी कलाकारांपाठोपाठ बॉलिवूडचेही कलाकार पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे सरसारवले आहेत. सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी पूरग्रस्तांना ५१ लाख रुपयांची मदत दिली आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर माहिती दिली आहे. बच्चन यांनी मुख्यमंत्री सहायता निधीत पैसे जमा करुन ही मदत केली असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.

- Advertisement -

रिलायन्सची पूरग्रस्तांना ५ कोटींची मदत

पूरग्रस्तांसाठी रिलायन्स कंपनीने देखील मदत केली असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवर दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी रिलायन्स कंपनीचे मालक मुकेश अंबानी यांचे चिरंजीव अनंत अंबानी यांच्यासोबत एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये अनंत मुख्यमंत्र्यांना ५ कोटीचा चेक देत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – राज ठाकरेंच्या भेटीनंतर विद्या चव्हाण म्हणाल्या, ‘आंदोलन होणारच’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -