घरमहाराष्ट्रशरद पवारांनी उद्धव ठाकरेंवर जादूटोणा केला; बावनकुळेंची घणाघाती टीका

शरद पवारांनी उद्धव ठाकरेंवर जादूटोणा केला; बावनकुळेंची घणाघाती टीका

Subscribe

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. शरद पवार यांनी अडीच वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्यावर जादूटोणा केला होता. त्यात उद्धव ठाकरे फसले आणि विचार न करता ते राष्ट्रवादी काँग्रेस सोबत गेले, अशी घणाघाती टीका बावनकुळेंनी केली आहे. आज ते साताऱ्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी शरद पवारांच्या ताब्यात जर एकदा कोणी आला, तर त्याची सुटका होत नाही, असा गंभीर आरोपही केला आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसने आता सत्तेत येण्याचे स्वप्न बघू नये असा टोलाही लगावला आहे. यासोबत अजित पवारांची नाराजी आणि सामनातील टीकेलाही त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

बावनकुळे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसने आता सत्तेत येण्याचे स्वप्न पाहणे सोडले पाहिजे. अडीच वर्षापूर्वी बेईमानीतून सत्ता बनवण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. उद्धव ठाकरेंवर एकप्रकारे जादूटोणा करण्यात आला होता. त्यात उद्धव ठाकरे फसवे आणि न विचार करता ते राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेले. हा जादूटोणा राष्ट्रवादी काँग्रेसने केला होता, मात्रा आता आम्ही सतर्क झालो आहोत.

- Advertisement -

दरम्यान 2024 मध्ये देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात आमचे 200 पेक्षा जास्त आमदार निवडून येतील, त्यामुळे राष्ट्रवादीने सत्तेत येण्याचा विचार आता करु नये, अशी टोलाही बावनकुळेंनी राष्ट्रवादीला लगावला आहे.

जादूटोणा करणारे भोंदूबाबा कोणय़ असे विचारले असता, ते भोंदूबाबा कोण, हे संपूर्ण देशाला आणि राज्याला माहित आहे. शरद पवारांच्या ताब्यात एकदा कोणी आला, तर त्याची सुटका होत नाही, असा गंभीर आरोपही बावनकुळेंनी केला आहे.

- Advertisement -

यावेळी बोलताना बावनकुळेंनी अजित पवारांच्या नाराजीच्या बातम्यांवरही भाष्य केले आहे. अजित पवार हे नेमके काय करतील, हे कोणाला कळू शकत नाही, ते काय बोलतात आणि काय करतात, हे अजित पवार यांनाच माहिती असतं.

दरम्यान आज सामना अग्रलेखातून तपास यंत्रणा या केंद्र सरकारच्या पाळीव प्राण्याप्रमाणे काम करतात असा गंभीर आरोप करण्यात आला होता. ज्यावर प्रत्युत्तर देताना बावनकुळे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी जेव्हापासून काँग्रेस – राष्ट्रवादी बरोबर मैत्री केली, तेव्हापासून त्यांच्याकडून अशाप्रकारची विधाने हजारवेळा आली आहेत. त्यामुळे त्यांना किती महत्त्व द्यायचं याचा विचार सर्वांनी केला पाहिजे. सत्ता गेल्याने ते प्रचंड अस्वस्थ आहेत. अशी टीकाही बावनकुळेंनी केली आहे.


हेही वाचा : मुंबईतील कोळीवाड्यांचे सुशोभीकरण करा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -