घरताज्या घडामोडीBBC Documentary: 'आम्हाला शहाणपण शिकवू नये', आशिष शेलारांचा मनसेवर हल्लाबोल

BBC Documentary: ‘आम्हाला शहाणपण शिकवू नये’, आशिष शेलारांचा मनसेवर हल्लाबोल

Subscribe

गुजरात दंगलीवर आधारीत असलेली BBC Documentaryवरून आता मुंबईतही राजकारण पेटले आहे. या माहितीपटावरून आज भाजपाच्या युवा कार्याकर्ते मुंबईमधील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सबाहेर आंदोलन करत आहेत. या माहितीपटाच्या वादावरून भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर टीका केली आहे.

गुजरात दंगलीवर आधारीत असलेली BBC Documentaryवरून आता मुंबईतही राजकारण पेटले आहे. या माहितीपटावरून आज भाजपाच्या युवा कार्याकर्ते मुंबईमधील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सबाहेर आंदोलन करत आहेत. या माहितीपटाच्या वादावरून भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर टीका केली आहे. मनसेने आम्हाला शहाणपण शिकवू नये. तसेच शरद पवारांनी आम्हाला सल्ला देत असताना केतकी चितळे प्रकरणात ही भूमिका का नाही घेतली? असा सावल उपस्थित करत आशिष शेलार यांनी मनसेवर हल्लाबोल केला. (Bjp Mla Ashish Shelar Slams Mns And Sharad Pawar On Bbc Documentary Screening Tata Institute Of Science)

मुंबईमधील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स (Tiss) या संस्थेत गुजरात दंगलीवर आधारीत असलेली BBC Documentary चे स्क्रिनिंग करण्यात येणार आहे. त्यावरुन आता दिल्ली आणि कोलकाता नंतर मुंबईतही राजकारण तापले आहे. या पार्श्वभूमीवर आज माध्यमांशी बोलत असताना आशिष शेलार यांनी मनसेवर हल्लाबोल केला. “आम्ही कुणाचाही हक्क हिरावून घेत नाहीत. जे मनसेचे लोक आम्हाला शहाणपण शिकवत आहेत. त्यांनी मनसेच्या विरोधात सोशल मीडियावर लिहिणाऱ्यांना शिवाजी पार्कवर आणून खळ्ळखट्याक करा असे सांगितले होते. तेव्हा हे सांगताना त्यांना लोकशाही आठवली नाही का?”, असा शब्दांत आशिष शेलारांनी मनसेवर टीका केली.

- Advertisement -

मनसेने बीबीसीच्या माहितीपटाबाबत काय म्हटले होते?

“लोकशाहीमध्ये कुणाचाही हक्क हिरावून घेता येत नाही”, असे मनसेने बीबीसीच्या माहितीपटावर प्रतिक्रिया देताना म्हटले होते.

- Advertisement -

याशिवाय, “बीबीसीच्या माहितीपटात अपप्रचार, दुष्प्रचार आणि असत्य पसरविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे समोर आले. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या संस्थेत बीबीसीचा माहितीपट दाखविण्याचे काम विशिष्ट धर्माच्या संघटनना करत असल्याची आमची माहिती आहे. या विषयामुळे मुंबई आणि महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकते. त्यामुळे आम्ही पोलिसांना अवगत केले. त्यामुळे यावर वेळीच कारवाई करा. पंतप्रधान मोदींच्या बदनामीचा प्रयत्न मुद्दामहून केला जात आहे. भावना भडकविण्याचा प्रयत्न होत आहे, त्यावर आम्ही आमचा निर्णय घ्यायला मोकळे आहोत. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सने असे धंदे बंद करावेत. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या आडून जर काही संघटनना हे काम करत असतील तर त्यांनी राजकारणात समोरासमोर येऊन सामना करावा”, असेही आशिष शेलार यांनी म्हटले.


हेही वाचा – कापसाला योग्य भाव मिळण्यासाठी अनिल देशमुखांचे केंद्र सरकारला पत्र

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -