घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रसर्वाधिक पावसाच्या तालुक्यातही दुष्काळाच्या झळा; भातपिके पाण्याअभावी करपली

सर्वाधिक पावसाच्या तालुक्यातही दुष्काळाच्या झळा; भातपिके पाण्याअभावी करपली

Subscribe

नाशिक : अल निनो वादळाच्या फटक्यामुळे महाराष्ट्रासह देशभरात यंदा मान्सूनचे आगाम उशिराने होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मात्र, सुरवातीलाच जोरदार पावसाचे आगमन झाल्याने समाधान व्यक्त करण्यात येत होते. ते समाधान काही दिवसपूरतेच राहिले कारण त्यानंतर मागील दोन महिन्यात राज्यभरात अत्यल्प पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यभरात भीषण दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातील सारवाढीक पावसाचा तालुका म्हणून ओळख असलेल्या इगतपुरी तालुक्यातही दुष्काळाच्या झळा बसू लागल्या आहेत. पाण्याच पीक असलेल भाताचे पिकही करपू लागले आहे.

शेतकरी हा आपल्या शेतीला आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे वाढवत असतो. तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतो. मात्र, आता पावसाचे माहेरघर, महाराष्ट्राची चेरापुंजी समजल्या जाणाऱ्या इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील परिसरात पावसाने दडी मारल्याने भात शेती धोक्यात आली आहे. इगतपुरी तालुक्यात दरवर्षी मुबलक पाऊस पडत असल्याने येथील शेतकरी वर्षातुन एकदाच भात शेती करतात. आधीच गारपिटीने शेतकरी त्रस्त झालेला होता. त्यात आता पावसाने दडी मारल्याने भाताची रोपेही करपली आहेत.

- Advertisement -

अजून दोन ते तीन दिवस पाऊस पडला नाही तर उभे भातपीक नष्ट होण्याची भिती शेतकरी वर्ग व्यक्त करीत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी निम्माही पाऊस पडलेला नाही. काही ठिकाणी विहिरींना पाणी आहे. मात्र महा वितरणच्या लोडशेडिंगमुळे शेतीला पाणी देण्यासाठी विजच नसल्याने शेतकरी हतबल आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर लोडशेडींग केली जात असल्याने विहिरीत पाणी असुनही शेत पिकाला पाणी भरता येत नसल्याने आता शेतकरी मेटाकुटीला आला आहे. शेती करताना पिकासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च येतो मात्र त्या तुलनेने शेत पिकाला बाजार भाव मिळत नाही. अल्पशा प्रमाणावर पडलेल्या पावसावर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर भात पिकाची लागवड केली आहे. मात्र आता पावसाने ओढ दिल्याने शेतातील उभी पिके सुकुन जात आहेत. शासनाने नाशिक जिल्हा दुस्काळग्रस्त घोषीत करावा अशी मागणी आता शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.

तालुक्यातील पुर्व भागातील टाकेद, साकुर, बेलगाव त-हाळे, धामणगांव, धामणी पिंपळगांव डुकरा, वाडीव-हे आदी भागात पावसाचे प्रमाण अत्यंत अल्प आहे. शेतीत लागवड केलेली पिके पाऊस पडत नसल्याने सुकुन चालली आहेत. शेतकरी जगला तरच देश पुढे जाईल. म्हणुन शासनाने काही तरी उपाय करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊन दिलासा देणे गरजेचे आहे. : पांडुरंग वारुंगसे, शेतकरी तथा माजी प. स. सभापती

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -