घरताज्या घडामोडी‘सर्वसमावेशक नेतृत्वं काळाच्या पडद्याआड गेलं’, उपमुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली

‘सर्वसमावेशक नेतृत्वं काळाच्या पडद्याआड गेलं’, उपमुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली

Subscribe

माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. प्रणव मुखर्जी साहेबांच्या निधनानं भारतीय राजकारणातील सर्वमान्य, सर्वसमावेशक नेतृत्वं काळाच्या पडद्याआड गेलं आहे. त्यांच्यासारख्या ज्येष्ठ, अनुभवी, विद्वान्, सुसंस्कृत, मार्गदर्शक नेतृत्वाचं निधन ही देशाची, भारतीय राजकारणाची मोठी हानी आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त करुन डॉ. प्रणव मुखर्जी यांना श्रद्धांजली वाहिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, डॉ. प्रणव मुखर्जी हे भारतीय राजकारणातील महान नेतृत्वं होतं. डॉ. मनमोहसिंह यांच्यासारख्या अर्थतज्ञ पंतप्रधानांच्या काळात देशाचं अर्थमंत्रीपद यशस्वीपणे सांभाळून त्यांनी क्षमता सिद्ध केली होती. देशासमोरच्या महत्वाच्या मुद्यांवर त्यांचं मतं महत्वाचं असायचं. देशासमोरच्या आव्हानात्मक परिस्थितीत राजकीय नेतृत्वामध्ये समन्वय साधून प्रश्न सोडवण्याचं कौशल्य आदरणीय प्रणवदांकडे होतं. त्यांचं निधन ही देशाची, महाराष्ट्राचीही हानी आहे. देशाच्या या महान नेतृत्वाला मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

- Advertisement -

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८४ व्या वर्षी दिल्लीच्या रिसर्च अँड रेफरल रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रणव मुखर्जी यांचे पुत्र अभिजीत मुखर्जी यांनी प्रणव मुखर्जी यांच्या मृत्यूची माहिती ट्विट करत दिली. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर दिल्लीच्या रिसर्च अँड रेफरल रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांच्यावर मेंदूची शस्त्रक्रिया झाली होती. यानंतर त्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली असता ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले.


हे ही वाचा- Breaking: माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे निधन


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -