घरमहाराष्ट्रफडणवीसांचे 'मी पुन्हा येईन' हे सत्यात कधी येणार हे माध्यमांनी सांगावं; जयंत...

फडणवीसांचे ‘मी पुन्हा येईन’ हे सत्यात कधी येणार हे माध्यमांनी सांगावं; जयंत पाटलांचा टोला

Subscribe

किरीट सोमय्या यांच्या प्रत्येक आरोपाला उत्तर देणे गरजेचे नाही - जयंत पाटील

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. देवेंद्र फडणवीस यांचे ‘मी पुन्हा येईन’ हे वाक्य गेल्या अडीच वर्षांपासून ऐकतो आहोत ते सत्यात कधी येईल हे माध्यमांनीच सांगावं असा टोला मंत्री जयंत पाटील यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना लगावला. ते शिर्डीत बोलत होते.

जयंत पाटील यांची राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा सुरु आहे. ते पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत आहेत. यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी निर्माण होत असल्याची टीका होत आहे. यावर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी मेळावे घेत नाही. मी आमचे जे मतदारसंघातील पदाधिकारी आहेत त्यांच्याशी संवाद साधतोय
त्यांचे जे काही प्रश्न असतील संघटनांतर्गत कामंसाठीची चर्चा आम्ही करतोय. हा परिवारातला अंतर्गत संवाद आहे, असं जयंत पाटील म्हणाले.

- Advertisement -

सोमय्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याची गरज नाही

किरीट सोमय्या विरोधात आहेत त्यामुळे विरोधात बोलणे त्यांचे काम आहे, त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणे गरजेचे नाही असे म्हणत जयंत पाटील यांनी सोमय्या यांच्या आरोपांना किंमत दिली नाही. शिर्डी येथे श्रीरामपूर आणि रहाता विधानसभा मतदारसंघाचा आढावा व परिवार संवाद साधण्यासाठी जयंत पाटील आले असता माध्यमांनी त्यांच्याशी संपर्क साधला त्यावेळी जयंत पाटील यांनी जोरदार फिरकी घेतली.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -