घरताज्या घडामोडीनिधीवरुन काँग्रेसची अजित पवारांविरोधात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे तक्रार

निधीवरुन काँग्रेसची अजित पवारांविरोधात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे तक्रार

Subscribe

महामंडळाच्या नियुक्त्या रखडलेल्या आहेत, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोळे यांनी सांगितले. निधी वाटपाची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे. आता ते स्वत: यात लक्ष घालणार आहेत. मुख्यमंत्री स्वत: निधीच्या वाटपाच्या वादावर तोडगा काढणार असल्याचे नाना पटोले म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात काँग्रेस नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे तक्रार केली आहे. काँग्रेसला निधी मिळत नसल्याने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या शिष्ट मंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. महाविकास आघाडीमध्ये समान निधी वाटप व्हावा अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका दाखवली असल्याची प्रतिक्रिया नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर दिली आहे.

अर्थमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार हे काँग्रेस मंत्र्यांकडील विभागांच्या फाईल सर्रास अडवतात. काँग्रेस मंत्र्यांच्या विभागांना योग्य निधी दिला जात नाही, अशी टीका काँग्रेसच्या शिष्टमंडळाने गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. आघाडीच्या घटक पक्षांना निधीचे समान वाटप व्हायला पाहिजे, अशी भूमिकाही शिष्टमंडळाने मांडली. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिष्टमंडळाला निधी वाटपात आपण स्वत: लक्ष घालतो, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस नेत्यांना दिले असल्याचे समजते. काँग्रेस मंत्र्यांच्या फाईली जेव्हा वित्त विभागाकडे येतात, तेव्हा अजित पवार त्यावर नकारात्मक शेरा मारतात. निधी देताना त्यांची उपकाराची भावना असते असे काँग्रेस नेत्यांचे मत आहे.

- Advertisement -

राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला येत्या ३ मार्चपासून सुरुवात होत आहे, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पुरवणी मागण्या मांडण्यात येणार आहेत. या पार्शवभूमीवर काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस मंत्र्यांच्या शिष्टमंडळाने उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन अजित पवार यांच्या विरोधात तक्रारींचा सूर लावला. काँग्रेसकडे सार्वजनिक बांधकाम, ऊर्जा, आदिवासी विकास, महिला आणि बालविकस अशी थेट जनतेशी संबंधित खाती आहेत. या खात्यांना यंदाच्या अर्थसंकल्पना योग्य निधीची तरतूद करावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे.

राज्य सरकारला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत . त्यानिमित्त मुख्यमंत्र्यांना भेटलो. काँग्रेसच्या मंत्र्यांच्या विभागांना निधी मिळत नाही, अशी आमची तक्रार होती. ऊर्जा विभाग अडचणीत आहे, वीज कापण्याची वेळ आली आहे. आदिवासी विभागाला सर्वसाधरण बजेटमधून निधी मिळत नाही. महामंडळाच्या नियुक्त्या रखडलेल्या आहेत, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोळे यांनी सांगितले. निधी वाटपाची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे. आता ते स्वत: यात लक्ष घालणार आहेत. मुख्यमंत्री स्वत: निधीच्या वाटपाच्या वादावर तोडगा काढणार असल्याचे नाना पटोले म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : “वेट अँड वॉच” संजय राऊतांचे मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर सूचक विधान

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -