घरताज्या घडामोडीराऊतांनी कायमचंच मौन धारण केलं तर शिवसेनेचं भलं होईल, खासदार नवनीत राणांचा...

राऊतांनी कायमचंच मौन धारण केलं तर शिवसेनेचं भलं होईल, खासदार नवनीत राणांचा टोला

Subscribe

महाविकास आघाडीतील नेत्यांची केंद्रीय तपास यंत्रणांकडून होत असलेल्या कारवाईंवरून शिवसेना नेत्यांना सातत्याने प्रश्न विचारले जात आहेत. त्यामुळे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी कभी कभी मौन सबसे अच्छा उत्तर..अशा प्रकारचं ट्विट केलं होतं. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला नव्हता. मात्र, कायमचंच मौन धारण केलं तर शिवसेनेचं भलं होईल, असं म्हणत खासदार नवनीत राणा यांनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे.

खासदार नवनीत राणा यांनी नवी दिल्ली येथील प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्यासह शिवसेनावरही निशाणा साधला आहे. खासदारांनाही विचारलं तर त्यांना आघाडी नको आहे. त्यांना युतीच हवी आहे. राऊतांनी बोलणं जर बंद केलं तर शिवसेनेचंच भलं होईल, अशा राणा म्हणाल्या. तसेच त्यांनी नगरविकास मंत्र्यांबाबत देखील वक्तव्य केलं आहे. एकनाथ शिंदे हे शिवसेनेतील सर्वात हुशार व्यक्ती आहेत. मुख्यमंत्र्यांना जर घराबाहेर पडता येत नसेल तर त्यांना मुख्यमंत्री करावं, असं राणा म्हणाल्या.

- Advertisement -

ज्या पद्धतीनं शिवसेना भाजपच्या नावानं सत्तेत राहिली. शिवसेना त्यांची नाही झाली तर काँग्रेसची कुठून होणार?, काँग्रेसही इतकी लाचार झाली आहे की, इतकं ऐकूनही सरकारमध्ये आहे. त्यांच्या अध्यक्षांबद्दल वाईट बोलूनही ते महाराष्ट्रात शिवसेनेसोबत आहेत, असं नवनीत राणा म्हणाल्या.

मोहित कंबोज यांचं ट्विट

भाजप नेते मोहित कंबोज यांनी संजय राऊत यांच्या ट्विटला उत्तर दिलं होतं. आता तुम्ही परिपक्व झालात, अशा प्रकारचं ट्विट मोहित कंबोज यांनी करत राऊतांवर एकप्रकारे टीका केली होती.

- Advertisement -


हेही वाचा : Corona Vaccination : १२ ते १४ वयोगटातील मुलांचे लसीकरण ; चार दिवसांत १७,६०० ने वाढ


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -