घरमहाराष्ट्रजिवाचं बरं-वाईट झाल्यास शिंदे-फडणवीस सरकार जबाबदार; राऊतांचा गंभीर आरोप

जिवाचं बरं-वाईट झाल्यास शिंदे-फडणवीस सरकार जबाबदार; राऊतांचा गंभीर आरोप

Subscribe

शिंदे- फडणवीस सरकार माझ्या जीवाशी खेळतयं, त्यामुळे जीवाचं काही बरं – वाईट झाल्यास त्याला सरकार जबाबदार असेल असा गंभीर आरोप संजय राऊतांनी केली आहे. सूडबुद्धीने कारवाई करत सुरक्षा काढून ती सत्ताधारी नेत्यांना दिली जात असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे. राऊत आज मुंबईत माध्यामांशी बोलत होती, त्यावेळी बोलताना संजय राऊतांनी सुरक्षा काढा, अशी सांगणारी कोणती कमिटी आहे? असा सवालही उपस्थित केला आहे.

तुमच्या घरी अज्ञातांकडून रेकी केली जातेय याबाबत राऊत म्हणाले की, मला पोलीस, गुप्तचर यंत्रणांकडूनही याबाबत कळलं आहे, गेल्या 25 ते 30 वर्षें मुंबई दंगलीपासून सुरक्षा व्यवस्था होती. पण या सरकारने आता सर्व सुरक्षा काढून घेतली आहे. आम्ही पुन्हा सुरक्षा मागितलेली नाही, आणि मागणारही नाही.

- Advertisement -

मी सामना कार्यालय, शिवसेना भवनात बसलेलो असताना तसचं जेलमध्ये जाताना किंवा घरी येताना याच कारणामुळे पोलिसांची सुरक्षा दिली जात होती. काहीतरी होईल याची माहिती असतानाही सरकारने सुरक्षा काढली आहे. याचा अर्थ सरकार माझ्या जीवाशी खेळत आहे. पण काही झालं तरी मी सरकारकडे सुरक्षा मागणार नाही, असही संजय राऊत म्हणाले आहेत.

राऊत पुढे म्हणाले की, कोणत्या नियमाने आणि भूमिकेतून ही सुरक्षा काढण्यात आली? अशी कोणती कमिटी आहे ज्यांनी एका क्षणात सर्वांची सुरक्षा काढली आणि सत्ताधारी लोकांना दिली. यासंबंधीत जनतेच्या मनात काही शंका आणि प्रश्न आहेत. आमच्या जीवाचं काही बरं वाईट झाल्यास याला सरकार जबाबदार असेल. आमच्यावर हल्ले व्हावेत, दबावाखाली राहावं यासाठी सूडबुद्धीने ही कारवाई करण्यात आली आहे. पण तसं काही होणार नाही, असही राऊत म्हणाले.


…तर ‘त्या’ भाजप नेत्यांनी आदित्य ठाकरेंची माफी मागा; राऊतांची मागणी


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -