सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राणेंनी महाविकास आघाडी विशेष म्हणजे शिवसेनेला धूळ चारली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजपच्या विजयावर आमदार ॲड. आशिष शेलार मालवणी भाषेतून प्रतिक्रिया दिली आहे. आज सिंधुदुर्गात आघाडीचो भोपळो फुटलो, असा टोला शेलार म्हणाले.
ॲड. आशिष शेलार यांनी ट्विट करत महाविकास आघाडीला लगावत आव्हान दिलं आहे. “देवांक सोडल्यान अन् देवचराक धरल्यान आणि विधान परिषदेत एक जागा गमवल्यान्…आज सिंधुदुर्गात आघाडीचा भोपळो फुटलो…नवी मुंबई, ठाणे, मुंबई महापालिका निवडणुकींच्या निकालाची ही नांदी आहे. अमितभाई शाह म्हणाले त्याप्रमाणे हिम्मत असेल तर तिघेही एकत्र समोर लढाईला या आम्ही तयार आहोत!” असं ॲड. आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
देवांक सोडल्यान अन् देवचराक धरल्यान आणि
विधान परिषदेत एक जागा गमवल्यान्…आज सिंधुदुर्गात आघाडीचा भोपळो फुटलो…नवी मुंबई, ठाणे, मुंबई महापालिका निवडणुकींच्या निकालाची ही नांदी आहे.
मा. अमितभाई शाह म्हणाले त्याप्रमाणे हिम्मत असेल तर तिघेही एकत्र समोर लढाईला या आम्ही तयार आहोत!— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) December 31, 2021
जिल्हा बँकेवर राणेंचं वर्चस्व
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहीलेल्या आणि प्रतिष्ठेच्या बनलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूकीत अखेर राणेंनी बाजी मारली आहे. यामध्ये भाजपकडे ११ तर महाविकास आघाडीला ८ जागा मिळाल्या आहेत. विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत आणि उपाध्यक्ष सुरेश दळवी यांना या निवडणुकीत पराभवाचा धक्का बसला आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या प्रतिष्ठेच्या ठरलेल्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत पराभूत झाले आहेत. तर भाजपचे विठ्ठल देसाई विजयी झाले आहेत. या ठिकाणी दोघांनाही समसमान मते मिळाली होती. त्यामुळे चिठ्ठीद्वारे झालेल्या प्रक्रियेत त्या ठिकाणी देसाई यांना विजयी घोषित करण्यात आले आहे.
हेही वाचा – अजितदादा म्हणाले संस्था उभ्या करायला अक्कल लागते, आता राणेंनी दिलं रोखठोक उत्तर