घरमुंबईराष्ट्रीय रबर धोरणामुळे आर्थिक उत्पन्नात वाढ होणार - सुरेश प्रभू

राष्ट्रीय रबर धोरणामुळे आर्थिक उत्पन्नात वाढ होणार – सुरेश प्रभू

Subscribe

राष्ट्रीय रबर धोरणामुळे देशातील आर्थिक उत्पन्नात वाढ होणार असल्याचे वक्तव्य केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितले आहे. मुंबईत इंडिया रबर एक्सपो - २०१९ च्या १० व्या आवृत्तीचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले.

राष्ट्रीय रबर धोरणामुळे देशातील आर्थिक उत्पन्नात वाढ होणार असल्याचे वक्तव्य केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितले आहे. वाणिज्य व उद्योग मंत्री सुरेश प्रभु यांनी आज मुंबईत इंडिया रबर एक्सपो – २०१९ च्या १० व्या आवृत्तीचे उद्घाटन केले त्यावेळी ते बोलत होते. या धोरणामुळे रबर उद्योग वेगाने वाढेल, रोजगाराच्या संधी वाढवेल, निर्यातीमध्ये वाढ होईल आणि भारताच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होईल असे मत प्रभू यांनी मांडले. याप्रसंगी आयआरइचे चेअरमन विक्रम मकर, आयआरईचे प्रमुख विष्णू भीमराजका आदी मान्यवर उपस्थित होते.

काय म्हणाले प्रभू

प्रभू यांनी सांगितले की, “सरकार देशाच्या अर्थव्यवस्थेची वाढ आणि सूक्ष्म पातळीवर व्यवसायात सहजतेने सुधारणा करण्यासाठी व्यापक तंत्रज्ञानावर कार्यरत आहे. सरकार भारताच्या निर्यातीत वाढ करण्यासाठी सरकार काम करीत आहे आणि गेल्या १३-१४ महिन्यांमध्ये भारतच्या निर्यातीमध्ये जवळपास १०% वाढ झाली आहे.” इंडिया रबर एक्सपो हे आशियातील सर्वात मोठे रबर एक्सपो आहे. भारतीय कंपन्यांना परदेशी कंपन्यांना भेटायला आणि सहयोग करण्यासाठी एक अद्वितीय संधी येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -