कॉंग्रेसने फक्त जमिनीवर नाही तर पंचमहाभूतांवरही घोटाळे केले असल्याचा आरोप भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केला आहे. सध्या राजस्थानमध्ये विधानसभा निवडणूकीचे वातावरण आहे. या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहा सोमवारी राजस्थानच्या प्रतापगढमध्ये प्रचारासाठी आले होते. यावेळी प्रचारसभेत त्यांनी कॉंग्रेसवर हल्लाबोल केला. त्याचबरोबर अमित शहा यांनी राहुल गांधीवर देखील सडकून टीका केली. राहुल गांधींना मोदी फोबीया झाला असल्याचे ते पुन्हा म्हटले आहेत.
हेही वाचा – मग अमित शहांना सुद्धा बिर्याणी पाठवून देतो – ओवैसी
नेमकं काय म्हणाले अमित शहा?
अमित शहा म्हणाले की, कॉंग्रेस काळात प्रचंड भ्रष्टाचार झाला. जगात पंचमहाभूतं आहेत. यामध्ये आकाश, जमीन, समुद्र, पाताळ यांचा सहभाग होतो. त्याचप्रमाणे कॉंग्रेसने आकाशात वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळा, जमिनीवर आदर्श घोटाळा, समुद्रात पाणबुड्यांचा घोटाळा आणि जमिनीखाली कोळसा घोटाळा केला. त्यामुळे कॉंग्रेसने पंचमहाभूतांवरही घोटाळा केला आहे, असं अमित शहा म्हणाले आहेत. दरम्यान, कॉंग्रेसने राजस्थानला काय दिले, असा सवाल शहा यांनी केला. त्याचबरोबर कॉंग्रेसने आदिवासी समाजासाठी काहीच केले नसल्याचे शहा म्हणाले.
Amit Shah in Pratapgarh, Rajasthan: Duniya mein 5 chize hoti hain-antariksh,akash,bhumi,samundra&pataal. Congress ne antariksh mein ISRO aur 2G ka ghotala kiya,akash mein Westland Helicopters ka,bhumi par Adarsh Society ka,dariya mein submarine ka aur pataal se koyla bhi le gaye pic.twitter.com/FELt0cyOVU
— ANI (@ANI) December 3, 2018
हेही वाचा – राम मंदिरासाठी अध्यादेश काढता येणार नाही – अमित शहा