घरअर्थजगतएटीएममधून पैसे काढण्याच्या नियमात बदल

एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमात बदल

Subscribe

स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) एटीएममधून पैसे काढण्याचे नियम बदलले आहेत. एसबीआयने लॉकडाऊन काळात ग्राहकांना दिलेली ३ महिन्यांची सूट पुढे वाढवलेली नाही आहे. एसबीआयने दिलेल्या सूटची मुदत ३० जून रोजी संपली. कोरोना मधून तसंच इतर बँक एटीएममधून मोठ्या व्यवहारांसाठी सेवा शुल्क माफ केलं होतं. या संदर्भात बँकेने आपल्या संकेतस्थळावरही माहिती दिली होती. दरम्यान, आता नियमांमध्ये बदल केला आहे.

बचत बँक खात्यात सरासरी २५ हजार मासिक शिल्लक (एएमबी) असलेल्या खातेधारकांना आठ विनामूल्य व्यवहाराची परवानगी असणार आहे. ज्यामध्ये एसबीआयच्या एटीएममध्ये पाच व्यवहार आणि तीन मेट्रो सेंटर (मुंबई, नवी दिल्ली, चेन्नई, हैदराबाद, कोलाकाता, बेंगलुरू) बँक एटीएममध्ये व्यवहार करता येणार आहे. त्याचबरोबर, महानगर नसलेल्या शहरांमधील अशा खातेदारांना एसबीआय एटीएममध्ये पाच आणि इतर पाचसहित १० विनामूल्य व्यवहार करता येणार आहेत.

- Advertisement -
  • खात्यात २५,००० ते ५०,००० एवढी रक्कम बँक खात्यात शिल्लक असेलेले एसबीआय खातेधारक ८ विनामूल्य व्यवहार (३ महानगर, ५ बिगर मेट्रो) करू शकतात.
  • एसबीआय खातेधारक जे त्यांच्या खात्यात सरासरी ५० हजार ते १ लाख रुपयांची शिल्लक ठेवतात ते ८ विनामूल्य व्यवहार करू शकतात. (३ महानगर, ५ बिगर मेट्रो)
  • ज्या एसबीआय ग्राहकांनी त्यांच्या खात्यात मासिक सरासरी १,००,००० पेक्षा जास्त रक्कम शिल्लक ठेवली आहे त्यांना एसबीआय एटीएम व इतर एटीएममधून अमर्याद व्यवहाराची परवानगी असेल.
  • बँक मर्यादेपेक्षा अधिक रक्कम काढण्यासाठी 10 रुपये अधिक जीएसटी आणि २० रुपये अधिक जीएसटी आकारणार.
  • खात्यात अपुरा बॅलंस असल्यास २० रुपये अधिक जीएसटी आकारणार.
  • एसबीआय एटीएम व इतर बँक एटीएमवर सर्व ठिकाणी सर्व वेतन खात्यांसाठी विनामूल्य अमर्यादित व्यवहार उपलब्ध आहेत.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -