घरमहाराष्ट्रसनदी अधिकारी व आयुक्त चहल विश्वासात घेत नाहीत, महापौर पेडणेकरांकडून खदखद

सनदी अधिकारी व आयुक्त चहल विश्वासात घेत नाहीत, महापौर पेडणेकरांकडून खदखद

Subscribe

महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या, उद्धवजी कायम सांगत आहेत की आपल्याला लॉकडाऊन परवडण्यासारखे नाही. आपल्याला लॉकडाऊन करायचाच नाही. परंतु लोक स्वैर वागत आहेत. मुंबईकरांनी अनेक आव्हानं पेलली आहेत. अनेक आव्हानं त्यांनी परतवलीत. ज्या पद्धतीनं रुग्णसंख्या चार पटीनं वाढतेय. आता चार पटीनं वाढणाऱ्या रुग्णांच्या संख्येला आळा घालायचा असेल तर आपल्याला मार्गदर्शक तत्त्वं पाळायलाच हवीत.

मुंबईः गेल्या काही दिवसांपासून राज्यासह मुंबईत कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेचीही चिंता वाढलीय. मुंबईचे पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनीसुद्धा लॉकडाऊनचे संकेत दिलेत. त्यामुळे लॉकडाऊन लागणार का याचीच चिंता सगळ्यांना सतावतेय. त्यातच आता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी खदखद व्यक्त केलीय. सनदी अधिकारी आणि मुंबईचे पालिका आयुक्त विश्वासात घेत नाहीत, असंही किशोरी पेडणेकर म्हणाल्यात.

माय महानगरशी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी बातचीत केलीय. त्यावेळी त्या बोलत होत्या. सनदी अधिकारी आणि मुंबईचे बीएमसी कमिश्नर आम्हाला विश्वासात घेत नाहीत हे नक्की आहे. परंतु ते जरी घेत नसले तरी आमची जबाबदारी आहे. स्वतः आदित्य ठाकरे फिरतायत. मी स्वतः फिरतेय. काही गोष्टी सांगितल्या जात नाहीत. पण त्यांनी सांगावं म्हणून सतत रेटा लावणं त्यापेक्षा आम्ही कामाला जोर देत आहोत. त्यामुळे ते विश्वासात घेत नाही हे खरं आहे. पण त्यांनी घ्यायला हवं, कारण तो त्यांच्या कामाचा एक भाग आहे. लोकशाहीमधला एक मानणारा भाग आहे. ते घेत नसले तरी आम्ही जातोय. आम्ही स्वतः जाऊन त्या सगळ्या गोष्टी करतोय. तसेच त्या वेळेला काय कमी असेल तेही त्यांना निर्देश देतोय आणि ते पाळतायत, असंही मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्यात.

- Advertisement -

त्या म्हणाल्या, उद्धवजी कायम सांगत आहेत की आपल्याला लॉकडाऊन परवडण्यासारखे नाही. आपल्याला लॉकडाऊन करायचाच नाही. परंतु लोक स्वैर वागत आहेत. मुंबईकरांनी अनेक आव्हानं पेलली आहेत. अनेक आव्हानं त्यांनी परतवलीत. ज्या पद्धतीनं रुग्णसंख्या चार पटीनं वाढतेय. आता चार पटीनं वाढणाऱ्या रुग्णांच्या संख्येला आळा घालायचा असेल तर आपल्याला मार्गदर्शक तत्त्वं पाळायलाच हवीत. एसओपी काय आहे. एसओपी काय आहे हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. दोन लसीचे डोस घेणे आवश्यक आहे. गर्दीत न जाणं हे जास्त जरूरी आहे. मास्क लावणं हे तर मस्ट आहे, असंही मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्यात.

खाण्याच्या वेळेला सॅनिटायझर किंवा साबणानं हात धुणं या एवढ्या छोट्या गोष्टी जरी आपण पाळल्या तर आपण लॉकडाऊनपासून खूप लांब राहू. बरेचशे रुग्ण एक लस आणि दोन लस घेऊनही बाधित झालेले आहेत. राजकारणी सगळेच सांगतायत वेगळं आणि करतायत वेगळं. त्यामुळे सर्वच पक्षाच्या नेत्यांनी जे सांगू तसं वागायला हवं, जसं मुख्यमंत्री स्वतः वागतायत, राजेश टोपे स्वतः वागतायत, अजित पवार स्वतः वागतायत. घाबरायचं नाही, काळजी घेणे आपल्या हातात आहे. गर्दी न वाढवणं हे आपल्या हातात आहे. मुख्यमंत्री म्हणजे लाखोंचा पोशिंदा असतो, पोशिंदा म्हणजेच मुख्यमंत्री तर सुरक्षित राहिलेच पाहिजेत, पण माझी जनताही सुरक्षित राहिली पाहिजे हा त्यांचा सकारात्मक विचार आहे. ओमायक्रॉन घातक नाही, पण नियम पाळण्याची गरज आहे, असंही त्यांनी सांगितलंय.

- Advertisement -

इतर देशात ओमायक्रॉनचे रुग्ण दगावायलासुद्धा लागलेत. ते आपल्या देशात, महाराष्ट्रात आणि मुंबई व्हायला नाही पाहिजे. तर आपण सर्वांनी नियमांचं पालन केलं पाहिजे. नेत्यांकडे बघण्यापेक्षा माझं कुटुंब माझी जबाबदारी यात राहिलो ना तरी आपण आपल्या कुटुंबाला वाचवू शकतो आणि तेच केलं पाहिजे. आपल्या शेजारी बाहेरून कोण आलं याकडे किमान लक्ष असावं आणि त्याची माहिती महापालिका किंवा पोलीस स्टेशनला देण्यात यावी. जेणेकरून त्यांना लवकर पकडता येईल. त्यांची चाचणी झाली असेल तर चांगलेच आहे. पण नसेल झाले तर त्यांची चाचणी करून त्यांना सोडले जाईल, असंही त्या म्हणाल्यात.

डिसेंबरमध्ये बाधित होणारी मुलं 16 टक्के होती. 16 टक्क्यांमध्ये कधी वाढ होईल सांगता येत नाही. त्यामुळे खरंच मनापासून आम्ही समाधानी आहे. मुंबई महाराष्ट्रातील बाळं सुरक्षित राहतील. वय वर्ष 15 ते 18 आपण व्हॅक्सिन देतोय. मुंबईमध्ये तर नऊ सेंटर आहे. लस घेताना त्याला ताप असता कामा नये, त्याला सर्दी असता कामा नये ही सगळी लक्षणं बघून त्यांना ती दिली जाईल. त्यांची नोंद राहील. जुने टॅब व्यवस्थित करून त्यांना देण्यात आलेले आहेत. नवी टॅबबद्दल मला माहिती नाही. परंतु तुमच्या माध्यमातून मला आता ती कळलीय. मी निश्चितच आजच त्याचा संपूर्ण आढावा घेईन. जर चुकीचं असेल तर आपल्यासमोर आणेन, असंही त्यांनी जाता जात सांगितलंय.

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -