घरदेश-विदेशगोतबाया राजपक्षेंच्या राजीनाम्याचा आनंद; श्रीलंकेत कर्फ्यू तोडून सेलिब्रेशनसाठी लोकं उतरली रस्त्यावर

गोतबाया राजपक्षेंच्या राजीनाम्याचा आनंद; श्रीलंकेत कर्फ्यू तोडून सेलिब्रेशनसाठी लोकं उतरली रस्त्यावर

Subscribe

राजपक्षे यांनी पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांना कार्यवाहक राष्ट्रपती बनवले. यानंतर श्रीलंकेतील लोकांची नाराजी आणखी वाढली

श्रीलंकेतून मालदीव आणि नंतर सिंगापूरला पळून गेलेले गोतबाया राजपक्षे यांनी राष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला आहे. या निर्णयाचा परिणाम असा झाला की, ज्या आंदोलकांनी सरकारी इमारतींवर कब्जा केला त्यांनी जागा रिकामी करण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी रात्री राजपक्षे यांनी राजीनामा देताच लोकांचा आनंद गगणात मावेनासा झाला होता. यावेळी श्रीलंकन नागरिकांनी कर्फ्यूतोड सेलिब्रेशन केले. राजधानी कोलंबोत आनंदोत्सव साजरा करण्यासाठी लोक रस्त्यावर उतरले.

हेही वाचा :श्रीलंकेत जनता महागाईने त्रस्त, पंतप्रधानांच्या निवासस्थानी आंदोलक कॅरम खेळण्यात व्यस्त

- Advertisement -

गोतबाया यांच्या राजीनाम्याच्या वृत्तानंतर शहरात संचारबंदी असतानाही निषेध स्थळी आंदोलकांनी घोषणाबाजी करत फटाके फोडत डान्स केला. यावेळी काही लोकांकडून चांगल्या कारभाराची मागणी करण्यात आली, देशातील आर्थिक संकटाला आंदोलक राजपक्षे आणि त्यांच्या मित्रपक्षांना जबाबदार असल्याचे सांगत आहेत. विशेष म्हणजे काही काळापासून श्रीलंकेला इंधन आणि खाद्यपदार्थांसारख्या मूलभूत गोष्टींचा तुटवडा जाणवत आहे.

हेही वाचा : श्रीलंकेत आर्थिक संकट, मदतीसाठी ‘या’ देशांनी घेतला पुढाकार

- Advertisement -

राजपक्षे हे देश सोडून मालदीवला पळून गेल्याचे वृत्तानंतर सिंगापूरमध्ये राहणारे सुमारे दोन डझन श्रीलंकन नागरिक गुरुवारी चांगी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. आमची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करणाऱ्या गुन्हेगारांना आणि पळून गेलेल्या व्यक्तींना भेटण्यासाठी आम्ही आलो आहोत. अशी भावना यावेळी श्रीलंकन नागरिकांनी व्यक्त केली.

सौदी एअरलाइनचे एक विमान मालदीवमधून संध्याकाळी येथे आले. ज्यात राजपक्षे उपस्थित होते, मात्र काही वेळातच सिंगापूरच्या परराष्ट्र मंत्रालयाने त्यांना खासगी भेटीवर नेले. श्रीलंकेतील राजकीय आणि आर्थिक संकटाच्या काळात भारत तेथील लोकांच्या पाठीशी उभा आहे, भारताने गुरुवारी सांगितले की, श्रीलंकेच्या लोकांच्या पाठीशी आम्ही उभे राहू, लोकशाही मार्गाने एक घटनात्मक चौकट सरकारी समस्यांसह सद्य परिस्थितीतून लवकर मार्ग काढण्याची आशा बाळगतो. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी पत्रकारांना सांगितले की, भारत श्रीलंकेतील विकसित परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि त्या देशातील सर्व संबंधित भागधारकांच्या संपर्कात आहे.

राजपक्षे यांनी पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांना कार्यवाहक राष्ट्रपती बनवले. यानंतर श्रीलंकेतील लोकांची नाराजी आणखी वाढली. विरोधकांनाही विक्रमसिंघे यांचा राजीनामा हवा होता. यानंतर कडेकोट बंदोबस्त असतानाही संतप्त नागरिकांनी पंतप्रधान निवास गाठला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विक्रमसिंघे, प्रमुख विरोधी SJB पक्षाचे सजिथ प्रेमदास आणि ज्येष्ठ खासदार डल्लास अलापेरुमा हे अध्यक्षपदाच्या राजीनाम्यानंतर सर्वोच्च पदाच्या शर्यतीत आहेत.


…यांना लवकरच ‘शिल्लक यात्रा’काढावी लागणार, गजानन काळेंची आदित्य ठाकरेंवर टीका


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -