कोरोना विषाणूचा वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर देशव्यापी लॉकडाऊन २४ मार्चला जाहीर करण्यात आला. त्यामुळे अनेक भारतीय परदेशात अडकले. याच भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी सरकारने ‘वंदे भारत मिशन’ ही मोहीम सुरू केली. त्याअंतर्गत ऑपरेशन समुद्र सेतू देखील सुरू करण्यात आले. या मोहीमेमध्ये नौदलाची तीन युद्धनौका आणि ६४ विमानाचा वापर करून ७ मे ते १३ मेपर्यंत १४ हजारहून अधिक परदेशी अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणले जाणार आहे. दरम्यान आज याच मोहीमेचा भाग म्हणून मालदिवमध्ये अडकलेल्या भारतीयांना घेऊन आयएनएस जलाश्व युद्धनौका कोची बंदरात दाखल झाली आहे. यामध्ये ६९८ भारतीय नागरिक आणि १९ गर्भवती महिला आहेत.
#WATCH Kerala: INS Jalashwa arrives at Kochi Harbour bringing back 698 Indian nationals from Male, Maldives. According to the Indian Navy, there are 19 pregnant women among the 698 Indian nationals. #OperationSamudraSetu pic.twitter.com/ZTUjQ0hKDJ
— ANI (@ANI) May 10, 2020
या सर्व अडकलेल्या भारतीयांची तपासणी करून त्यांना क्वारंटाईन करण्यात येणार आहे. नौदलांची आयएनएसची जलाश्व युद्धनौका ही मालदिवची राजधानी माले बंदरात शुक्रवारी दाखल झाली होती. ती आज कोची बंदरात परतली आहे.
Kerala: 698 Indian nationals have been brought to Kochi Harbour onboard INS Jalashwa from Malé, Maldives under the #OperationSamudraSetu. https://t.co/77KikKejnR pic.twitter.com/gupuZUxSLP
— ANI (@ANI) May 10, 2020
मालदिवमध्ये पाहायला गेले २० हजारहून अधिक भारतीय नागरिक आहे. यामधील काही नागरिकांना भारतात परत आणले जाणार आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून या सर्व भारतीयांना मायदेशी परत आणले जात आहे. याशिवाय दुबईत अडकलेल्या भारतीय नागरिकांसाठी देखील आयएनएस शार्दुल ही युद्धनौका लाँच करण्यात आली आहे.
हेही वाचा – PHOTO: रणरणत्या उन्हात तान्ह्या बाळासह माय निघाली घराकडे