घरताज्या घडामोडीनितीन गडकरींकडून पालखी महामार्गाची पाहणी, उजनी धरणाबाबत केली मुख्यमंत्र्यांकडे मागणी

नितीन गडकरींकडून पालखी महामार्गाची पाहणी, उजनी धरणाबाबत केली मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Subscribe

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज आळंदी आणि पंढरपूर या दोन धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाची पाहणी केली. संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज या दोन्ही पालखी मार्गाचे सद्यस्थितीला ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे. या पालखी महामार्गाची पाहणी केल्यानंतर नितीन गडकरी यांनी उजनी धरणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली आहे.

नितीन गडकरी यांनी पालखी महामार्गाची पाहणी केल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते म्हणाले की, आज उजनी धरणावरून आलो. माझी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, एप्रिल-मे महिन्यात धरणातील पाणी कमी होते आणि पुणे-बंगळुरू रस्त्याकरीता रेती लागते. धरणातील जेवढा आपण गाळ काढू तेवढी धरणाची क्षमता वाढते. महाराष्ट्र सरकराने काही मार्ग काढला तर या धरणातील गाळ काढून याची नैसर्गिकरित्या क्षमता वाढेल, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना करणार आहे.

- Advertisement -

देहू आणि आळंदी या ठिकाणाहून अनवाणी अनेक लोक पायी पंढरपूरला जातात. या नागरिकांच्या दृष्टीने पालखी मार्ग विस्तार करण्याचे ठरविले आणि ते लवकरच पूर्ण होणार आहे. त्या गोष्टीचा मला आनंद आहे. राज्य सरकारने एकूण २४ पालखी स्थळाच्या ठिकाणी १० हजार नागरिकांची व्यवस्था होईल अशा स्वरुपाचा हॉल बांधवा. इतर वेळी तो हॉल लग्न कार्यासाठी उपलब्ध करून द्यावा. त्यातून मेंटेनन्स मार्गी लागेल, असं नितीन गडकरी म्हणाले.

- Advertisement -

सदर पालखी मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूंस वृक्षारोपण करण्याबरोबरच आवश्यक त्या ठिकाणी महाराष्ट्रातील संत महात्म्यांची शिल्पे,भित्तीचित्रे,अभंगवाणी आदि बाबींवर आधारित काम करण्यात येईल. यामुळे मार्गाच्या सौंदर्यात भर पडेल तसेच वारकऱ्यांना वारीच्या दरम्यान या सुविधांचा फायदा होईल. पालखी मार्गावर विशिष्ट प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात येणार असून यामध्ये विशेषतः चंदन, तुळशी, इतर सुगंधित वृक्षांबरोबरच वड, कडुनिंब, पिंपळ, चिंच या सावली देणाऱ्या वनौषधी वृक्षांची लागवड करण्यात येत आहे, असं ट्वीट नितीन गडकरी यांनी केलं आहे.


हेही वाचा : “उद्धव ठाकरे मला तोतऱ्या म्हणतात, पण याच तोतऱ्याने…”, किरीट सोमय्यांचं चॅलेंज


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -