घरमहाराष्ट्र"शिवसेनेला कोणताही धोका नाही", म्हणत उद्धव ठाकरेंकडून शिंदे गटाला टोला

“शिवसेनेला कोणताही धोका नाही”, म्हणत उद्धव ठाकरेंकडून शिंदे गटाला टोला

Subscribe

शिवसेना एकच आहे. एकच राहील. दुसरी शिवसेना मी मानत नाही. गद्दारी करणाऱ्या शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र ठरणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

शिवसेना एकच आहे. एकच राहील. दुसरी शिवसेना मी मानत नाही. गद्दारी करणाऱ्या शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र ठरणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण, सर्व बाजू तपासल्यास शिवसेनेला कोणताही धोका नाही. आम्ही सर्व गोष्टींची पूर्तता केल्याचे सांगत आज उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत शिंदे सरकारवर जोरदार टीका केलीय.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्री निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर वक्तव्य करत शिंदे-फडणवीस सरकारला धक्का दिलाय. केंद्रीय निवडणूक आयोगात शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्हाबाबत महत्त्वाची सुनावणी गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. ही सुनावणी आता अंतिम टप्प्यावर आल्याचं चित्र आहे. केंद्रीय निवडणूक आयोगात शिवसेनेची सुरु असलेल्या सुनावणीचा निर्णय हा सुप्रीम कोर्टाच्या 14 फेब्रुवारीच्या सुनावणीनंतर होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. त्यामुळे शिवसेना पक्षाचं भवितव्य धोक्यात येणार का? अशा चर्चा रंगू लागल्या होत्या. त्यावर आता उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिलंय.

- Advertisement -

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, लोकशाहीचं रक्षण करावं अशी निवडणूक आयोगाला विनंती असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. कारण पक्षांतर्गत घटनेचं पालन आम्ही पूर्ण केलं असल्याचे ते म्हणाले. शिंदे गटाला घटनाच नसल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाने आधी निर्णय द्यावा. न्यायालयाच्या निर्णयाआधी निवडणूक आयोगाचा निर्णय नको असेही उद्धव ठाकरे म्हणाले. निवडणूक आयोगाने काय करावं? हे आम्ही सांगू शकत नसल्याचेही ते म्हणाले. शिवसेनेत मुख्य नेता हे पद घटनाबाह्य आहे. ज्या शिंदे गटानं शिवसेनेवर दावा सांगितला आहे, त्यांनी शिवसेनेची घटना आम्हाला मान्य नाही असे सांगितले आहे. विभागप्रमुख हे पद शहरापुरते मर्यादीत असल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं, असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -