घरताज्या घडामोडीRaigad Bus Accident : रायगडमध्ये शिवशाही बसचा भीषण अपघात, तिघांचा मृत्यू

Raigad Bus Accident : रायगडमध्ये शिवशाही बसचा भीषण अपघात, तिघांचा मृत्यू

Subscribe

रिक्षा आणि शिवशाही बसचा भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना रायगडमध्ये घडली आहे. या रिक्षा आणि शिवशाही बसच्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील माणगावमध्ये हा अपघात झाला आहे.

रायगड : रिक्षा आणि शिवशाही बसचा भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना रायगडमध्ये घडली आहे. या रिक्षा आणि शिवशाही बसच्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील माणगावमध्ये हा अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की अपघातग्रस्त रिक्षाचा चुराडा झाला आहे. या अपघाताची माहिती मिळताच माणगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्या सुरूवात केली. तसेच, या अपघाताचा अधिक तपास केला जात आहे. (Raigad Bus Accident of st shivshahi bus three dead vvp96)

मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे येथून दापोलीच्या दिशेनी जाणारी शिवशाही बस रायगड जिल्ह्यातील मुंबई-गोवा महामार्गावरील माणगाव नजीक आली असता शिवशाही बस आणि रिक्षामध्ये भीषण अपघात झाला. अपघातामध्ये रिक्षातील तीन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. रविवारी सकाळी 11:30 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये रिक्षात असलेले दत्तात्रय वरणदेकर, प्रवीण मालसुरे व आणखी एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : बाळगंगा प्रकल्पग्रस्तांचे मतदानावर ‘बहिष्कार’ अस्त्र

या घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघाताचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही आहे. हा अपघात इतका भीषण होता की, अपघातामध्ये रिक्षाचा चक्काचूर झाला आहे. शिवाय, बसचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Raigad Crime News : हातभट्ट्यांवर रायगड पोलिसांची वक्रदृष्टी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -